शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

‘जलजीवन मिशन’च्या आराखड्यांतील उपाययोजनांची होणार पडताळणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:19 IST

अकोला : जलजीवन मिशनअंतर्गत राज्यात जिल्हानिहाय तयार करण्यात आलेल्या आराखड्यांतील उपाययोजनांच्या कामांची पडताळणी करून पुन्हा आराखडे सादर करण्याचे ...

अकोला : जलजीवन मिशनअंतर्गत राज्यात जिल्हानिहाय तयार करण्यात आलेल्या आराखड्यांतील उपाययोजनांच्या कामांची पडताळणी करून पुन्हा आराखडे सादर करण्याचे निर्देश राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने पडताळणी करून जिल्हानिहाय उपाययोजनांच्या कामांचे जिल्हानिहाय आराखडे पुन्हा सादर करावे लागणार आहेत.

राज्यातील ग्रामीण भागात दरडोई प्रति दिवस ६५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत राज्यात जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने २०२१-२२ या आर्थिक वर्षात करावयाच्या उपाययोजनांचे जिल्हानिहाय आराखडे राज्यातील जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आले व तयार करण्यात आलेले उपाययोजनांचे आराखडे शासनाच्या राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडे सादर करण्यात आले होते. दरम्यान, जलजीवन मिशनअंतर्गत तयार करण्यात आलेल्या जिल्हानिहाय आराखड्यातील उपाययोजनांच्या कामांची पडताळणी करून उपाययोजनांचे आराखडे पुन्हा सादर करण्याचे निर्देश राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या संचालकांनी २३ एप्रिल रोजी ‘व्हिडिओ काॅन्फरन्सिंग’द्वारे राज्यातील जिल्हा परिषदांच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. त्यानुसार जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हानिहाय तयार करण्यात आलेल्या आराखड्यातील उपाययोजनांच्या कामांची पडताळणी करून ,उपाययोजनांचे कामांचे जिल्हानिहाय आराखडे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत पुन्हा शासनाच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडे सादर करण्यात येणार आहेत.

आराखड्यांत ‘या’ उपाययोजनांचा आहे समावेश !

जलजीवन मिशनअंतर्गत राज्यात जलनिहाय तयार करण्यात आलेल्या आराखड्यांमध्ये जुन्या पाणीपुरवठा योजनांची पुनर्जोडणी, नवीन पाणीपुरवठा योजना, पाणीपुरवठा योजनांतर्गत घरोघरी नळ कनेक्शन उपलब्ध करून देणे आदी उपाययोजनांच्या कामांचा समावेश आहे. आराखड्यांत समाविष्ट या उपाययोजनांच्या कामांची पडताळणी करण्यात येणार आहे.