शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हमाल-मापा-यांना मिळणार एक रूपयात जेवण

By admin | Updated: July 25, 2015 01:17 IST

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा अनोखा उपक्रम.

खामगाव: बळीराजाला केवळ एक रुपयात जेवण देण्याचा अनोखा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती राबवित आहे. राज्यातील एकमेव असलेला पथदश्री प्रकल्प आता हमाल-व्यापार्‍यांसाठीही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शेतकर्‍यांप्रमाणेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल-मापार्‍यांना अल्पदरात भोजन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खामगाव कृउबा समितीच्यावतीने शेतकर्‍यांच्यासाठी बाजार समितीच्या एक रुपयांत जेवण या उपक्रम १४ ऑगस्ट २0१३ रोजी केले. बाजार समितीत माल विक्रीसाठी येणार्‍या प्रत्येक शेतकर्‍याला स्व. सुलोचनादेवी सानंदा शिदोरी गृहात जेवणाचे कुपन अडत्या देतो. अडत्याकडून कुपन घेतल्यानंतर शिदोरी गृहात एका रुपयात शेतकर्‍याला जेवणाची परवानगी दिली जाते. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रत्येक अडत्याला कुपन देण्यात आले आहे. दुपारी एक ते चार वाजेपर्यंत शेतकर्‍यांना या शिदोरी गृहात जेवण मिळते. यामध्ये पोळी, भाजी, मसाले भात, शिरा आदी मेनू असून, दररोज विविध भाज्यांचे नियोजन करण्यात आले आहे. बाजाराच्या दिवशी म्हणजेच गुरूवारी पातोडीची भाजी आणि शिरा हा विशेष मेनू दिल्या जातो. त्याचप्रमाणे उर्वरित दिवशी कधी कोबीची भाजी, वांगी, चना मसाला, आलू वाटाणे आदी भाज्यांचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना एका रुपयात पोटभर जेवणाचा अनोखा उपक्रम खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर आता कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल आणि मापार्‍यांना एक रुपयात जेवण मिळणार आहे.