शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

महापौर पद की विधानसभा उमेदवारी?

By admin | Updated: September 4, 2014 01:26 IST

अकोला महापौर पद की विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी यामध्ये राजकीय वर्तुळात गोंधळाची स्थिती.

अकोला : महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख निश्‍चित होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी पक्षाची मनधरणी करणार्‍या इच्छुकांसमोर राजकीय पेच निर्माण झाला असून, महापौरपद की विधानसभा, या विचाराने इच्छुकांचा गोंधळ उडाला आहे. यामध्ये प्रामुख्याने भाज पमधील इच्छुकांचा समावेश आहे.ज्योत्स्ना गवई यांच्या महापौरपदाचा कालावधी येत्या ९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यानुषंगाने आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन महापौर निवडीला राजकीय घडामोडींना वेग आला. सद्यस्थितीत सत्तापक्ष काँग्रेस आघाडीकडे ३६ नगरसेवक तर विरोधी पक्ष भाजप-शिवसेनेकडे सुद्धा ३६ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने निवडणुकीत प्रचंड चुरस होणार असल्याचे संकेत आहेत.भाजपप्रणीत महानगर सुधार समितीमध्ये काही आघाडीचे नगरसेवक असल्याने त्यांचे मत नेमके कोणाच्या पारड्या त जाईल, यावरही महापौरपदाचा खेळ अवलंबून आहे. हीच परिस्थिती काँग्रेस आघाडीत आहे. समाजवादी पार्टी, युडीएफसह काही अपक्ष नगरसेवकांना सांभाळून ठेवण्याची कसरत काँग्रेस आघाडीपेक्षा इच्छुक उमेदवारालाच जास्त करावी लागणार असल्याची माहिती आहे. अर्थातच, फोडाफोडीच्या राजकारणापेक्षा एकमेकांना सांभाळून ठेवण्याच्या राजकारणाला सुरुवात झाली असून अपेक्षांची पूर्तता करण्याकडे अनेकांचा कल आहे. या धामधुमीत विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी वरिष्ठांची मनधरणी करणार्‍या इच्छुकांना महापौरपदाची ह्यऑफरह्ण करण्यात आल्याने संबंधितांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. एकीकडे अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरपद खुणावत असतानाच, दुसरीकडे पाच वर्षांच्या संभाव्य आमदारकीवर पाणी फेरावे लागणार. दोन्ही निवडणुकीचा खर्च लक्षात घेतल्यास महापौरपदापेक्षा विधानसभेची निवडणूक जड जाण्यासोबतच निवडून येण्यावरही संभ्रमावस्था आहे. याची पूर्ण जाणीव संबंधी तांना असल्याने त्यांनी महापौरपदासाठी लक्ष केंद्रीत केल्याची माहिती आहे. काँग्रेसमधील इच्छुकांचा निर्णय प्रदेशाध्यक्षांच्या दरबारात होईल, मात्र उपमहापौरपदासह स्थायी समिती सभापतीपदाच्या इच्छूक उमेदवारासाठी प्रचंड माथापच्ची सुरु झाली आहे. *अपक्ष नगरसेवक भाजपच्या गळाला!मनपातील सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. काँग्रेस आघाडीत सामील झालेले अपक्ष व काही आघाडीचे नगरसेवक भाजपसोबत काम करण्यास इच्छुक आहेत. गतवेळी ऐनवेळेवर संबंधित नगरसेवकांनी ह्ययु टर्नह्ण घेतल्यामुळे भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले होते. यंदा मात्र परिस्थिती बदलण्याची चिन्हं आहेत.