शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

शहिदांचे पार्थिव आज पोहोचणार!

By admin | Updated: January 31, 2017 02:27 IST

अंत्यसंस्काराची तयारी; जिल्हाधिका-यांनी दिली माहिती.

अकोला, दि. ३0- काश्मीरमधील हिमस्खलनात जिल्हय़ातील शहीद दोन जवानांचे पार्थिव मंगळवारी दुपारपर्यंंत अकोल्यात पोहोचण्याची शक्यता असून, दोन्ही जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.अकोल्यातील वाशिम रोडस्थित पंचशील नगरमधील जवान आनंद शत्रुघ्न गवई आणि मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील संजय सुरेश खंडारे या दोन जवानांना गत २५ जानेवारी रोजी वीरमरण आले. १३ महार बटालियनचे जिल्हय़ातील दोन जवान शहीद झाल्याने, जिल्हय़ात शोककळा पसरली आहे. दोन्ही शहीद जवानांचे पार्थिव सोमवारी श्रीनगरमध्ये पोहोचले असून, शवविच्छेदन करण्यात आले. श्रीनगर येथून विमानाने शहीद जवानांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात येणार आहेत. दिल्ली येथून विमानाने त्यांचे पार्थिव नागपूर येथे पोहोचणार आहेत व नागपूर येथून शासकीय वाहनाने शहीद जवानांचे पार्थिव मंगळवारी दुपारपर्यंंत अकोल्यात पोहोचणार आहेत. त्यामध्ये संजय खंडारे यांचे पार्थिव माना येथे आणि आनंद गवई यांचे पार्थिव अकोला येथे पोहोचणार आहे. त्यामध्ये संजय खंडारे यांच्या पार्थिवावर माना येथे तर आनंद गवई यांच्या पार्थिवावर अकोल्यातील गीतानगर स्थित स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहीद जवानांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना विश्‍वासात घेऊन अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.