शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

बाजारपेठेवर अवकळा

By admin | Updated: March 17, 2015 01:05 IST

दुष्काळाच्या झळा; धान्य बाजार, सराफा, कापड व्यवसायात मंदीचे सावट.

विवेक चांदूरकर / अकोला: यावर्षी शेती व्यवसायात असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर पडला आहे. सराफा, कापड व भाजीपाला आदी व्यवसायांवर अवकळा पसरली आहे. शेतकर्‍यांची अवस्था दयनीय झाल्यामुळे बाजारपेठेतील आत्माच हरविला आहे. त्यातच गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान केले. यामुळे झालेल्या भाववाढीने सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत आहे. २0१४ - १५ वर्षातील खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे फळबागा, भाजीपाला उत्पादकांसह सर्वच शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागला असून, शेती व्यवसाय डबघाईस आला. याचा थेट परिणाम बाजारपेठेवर पडला. धान्य बाजारासह सोने व कापड विक्रेत्यांनाही यावर्षी मंदीचा सामना करावा लागत आहे. शेतकर्‍यांसोबतच व्यापारीही त्रस्त झाले आहेत. सोन्याचे भाव कमी होत असल्यामुळे गुंतवणूक म्हणून कर्मचार्‍यांनी याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सराफा व्यवसाय यावर्षी विवाह सोहळे व शेतकर्‍यांवरच प्रामुख्याने निर्भर होता; मात्र शेती व्यवसायातील नुकसानामुळे सोने खरेदी-विक्रीत २0 ते ३0 टक्क्यांनी घट आली आहे. कापड व्यवसायावरही मंदीचे सावट जाणवत आहे. कापड व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कापड विक्रीत १0 ते १५ टक्के घट आली आहे. विवाह सोहळ्यांकरिता महागडे व मोठय़ा प्रमाणात कपड्यांची खरेदी करण्यात येते; मात्र ग्रामीण भागात यावर्षी विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आल्यामुळे वस्त्रांची खरेदी कमी झाली आहे. गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. भावात वीस ते तीस टक्के वाढ झाल्याचा थेट प्रभाव सामान्य ग्राहकांच्या खिशावर पडत आहे. जिल्ह्यातील भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातून आयात करावी लागत आहे. मोठे व्यावसायिक, किरकोळ दुकानदारांसह ग्राहकांनाही दुष्काळाची झळ बसत आहे.