शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बाजारपेठेवर अवकळा

By admin | Updated: March 17, 2015 01:05 IST

दुष्काळाच्या झळा; धान्य बाजार, सराफा, कापड व्यवसायात मंदीचे सावट.

विवेक चांदूरकर / अकोला: यावर्षी शेती व्यवसायात असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर पडला आहे. सराफा, कापड व भाजीपाला आदी व्यवसायांवर अवकळा पसरली आहे. शेतकर्‍यांची अवस्था दयनीय झाल्यामुळे बाजारपेठेतील आत्माच हरविला आहे. त्यातच गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान केले. यामुळे झालेल्या भाववाढीने सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत आहे. २0१४ - १५ वर्षातील खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे फळबागा, भाजीपाला उत्पादकांसह सर्वच शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागला असून, शेती व्यवसाय डबघाईस आला. याचा थेट परिणाम बाजारपेठेवर पडला. धान्य बाजारासह सोने व कापड विक्रेत्यांनाही यावर्षी मंदीचा सामना करावा लागत आहे. शेतकर्‍यांसोबतच व्यापारीही त्रस्त झाले आहेत. सोन्याचे भाव कमी होत असल्यामुळे गुंतवणूक म्हणून कर्मचार्‍यांनी याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सराफा व्यवसाय यावर्षी विवाह सोहळे व शेतकर्‍यांवरच प्रामुख्याने निर्भर होता; मात्र शेती व्यवसायातील नुकसानामुळे सोने खरेदी-विक्रीत २0 ते ३0 टक्क्यांनी घट आली आहे. कापड व्यवसायावरही मंदीचे सावट जाणवत आहे. कापड व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कापड विक्रीत १0 ते १५ टक्के घट आली आहे. विवाह सोहळ्यांकरिता महागडे व मोठय़ा प्रमाणात कपड्यांची खरेदी करण्यात येते; मात्र ग्रामीण भागात यावर्षी विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आल्यामुळे वस्त्रांची खरेदी कमी झाली आहे. गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. भावात वीस ते तीस टक्के वाढ झाल्याचा थेट प्रभाव सामान्य ग्राहकांच्या खिशावर पडत आहे. जिल्ह्यातील भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातून आयात करावी लागत आहे. मोठे व्यावसायिक, किरकोळ दुकानदारांसह ग्राहकांनाही दुष्काळाची झळ बसत आहे.