शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बाजारपेठेवर अवकळा

By admin | Updated: March 17, 2015 01:05 IST

दुष्काळाच्या झळा; धान्य बाजार, सराफा, कापड व्यवसायात मंदीचे सावट.

विवेक चांदूरकर / अकोला: यावर्षी शेती व्यवसायात असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर पडला आहे. सराफा, कापड व भाजीपाला आदी व्यवसायांवर अवकळा पसरली आहे. शेतकर्‍यांची अवस्था दयनीय झाल्यामुळे बाजारपेठेतील आत्माच हरविला आहे. त्यातच गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान केले. यामुळे झालेल्या भाववाढीने सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत आहे. २0१४ - १५ वर्षातील खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे फळबागा, भाजीपाला उत्पादकांसह सर्वच शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागला असून, शेती व्यवसाय डबघाईस आला. याचा थेट परिणाम बाजारपेठेवर पडला. धान्य बाजारासह सोने व कापड विक्रेत्यांनाही यावर्षी मंदीचा सामना करावा लागत आहे. शेतकर्‍यांसोबतच व्यापारीही त्रस्त झाले आहेत. सोन्याचे भाव कमी होत असल्यामुळे गुंतवणूक म्हणून कर्मचार्‍यांनी याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सराफा व्यवसाय यावर्षी विवाह सोहळे व शेतकर्‍यांवरच प्रामुख्याने निर्भर होता; मात्र शेती व्यवसायातील नुकसानामुळे सोने खरेदी-विक्रीत २0 ते ३0 टक्क्यांनी घट आली आहे. कापड व्यवसायावरही मंदीचे सावट जाणवत आहे. कापड व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कापड विक्रीत १0 ते १५ टक्के घट आली आहे. विवाह सोहळ्यांकरिता महागडे व मोठय़ा प्रमाणात कपड्यांची खरेदी करण्यात येते; मात्र ग्रामीण भागात यावर्षी विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आल्यामुळे वस्त्रांची खरेदी कमी झाली आहे. गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. भावात वीस ते तीस टक्के वाढ झाल्याचा थेट प्रभाव सामान्य ग्राहकांच्या खिशावर पडत आहे. जिल्ह्यातील भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातून आयात करावी लागत आहे. मोठे व्यावसायिक, किरकोळ दुकानदारांसह ग्राहकांनाही दुष्काळाची झळ बसत आहे.