शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

व्यापा-यांशी संगनमत करणार्‍या बाजार समित्या बरखास्त करणार!

By admin | Updated: April 23, 2017 01:35 IST

व्यापार्‍यांशी संगनमत करू न शेतक-यांना लुटणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त केल्या जाणार असल्याचा इशारा राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शनिवारी येथे दिला.

अकोला : नाफेडच्या खरेदी केंद्रावर व्यापार्‍यांशी संगनमत करू न शेतकर्‍यांना लुटणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त केल्या जाणार असल्याचा इशारा राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शनिवारी येथे दिला.शासनाच्या उन्नत शेती, समृद्ध शेतकरी या उपक्रमांतर्गत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील स्व. डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात आयोजित कार्यशाळेत कृषी मंत्री बोलत होते. कार्यक्रमाला कृषी विभागाचे विभागीय संयुक्त संचालक एस.आर. सरदार, डॉ. पंदेकृविचे प्रभारी कुलगुरू डॉ. विलास भाले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संचालक संशोधन डॉ. दिलीप मानकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुरेश बाविस्कर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.उन्नत शेती योजनेवर बोलताना कृषी मंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्त उत्पादन आणि उत्पन्न कसे वाढेल, यावर भर देण्यात आला असल्याचे सांगितले. याकरिता कृषी विभागाने विविध कार्यक्रम येत्या खरीप हंगामात राबविण्याचे ठरविले आहे. आता थेट कृषी विभाग ते शेतकरी असा संवाद राहणार असून, शेतकर्‍यांनी यंत्र खरेदी करायचे, कृषी विभाग त्यांना अनुदानाचा धनादेश देईल. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळामार्फत कृषी अवजारांची खरेदी बंद करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी सव्वाकोटी शेतकर्‍यांनी पंतप्रधान पीक विमा काढला होता. यावर्षी तो दीड कोटींपर्यंत नेण्याचा संकल्प केला आहे. मागील वर्षी पंतप्रधान पीक विमा काढण्यात देशात जालना जिल्हा प्रथम आला होता. यावर्षी प्रत्येक जिल्हय़ात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांचेही प्रबोधन केले जाणार आहे. रोहिणी नक्षत्रापासून राज्यात शेती जनजागृती पंधरवडा साजरा केला जाणार असून, शेतकर्‍यांना शेती, प्रक्रिया, उद्योगाची इत्थंभूत माहिती शेतकर्‍यांना दिली जाणार आहे.बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेतमालासाठी गोदामे उभारणार असून, आठ हजार कांदा चाळी उभारण्याचे नियोजन केले असल्याचे ते म्हणाले. शेतकर्‍यांचा शेतमाल, सीताफळ कृषी विभाग खरेदी करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. प्रास्ताविक सरदार यांनी केले. यावेळी कृषी मंत्र्यांच्या हस्ते शेतकर्‍यांना धनादेश दिले.यावेळी गौतम शिरसाट या शेतकर्‍याला व कृषी यांत्रिकीकरणांतर्गत ट्रॅक्टर व पीक कापणी यंत्रासाठी रवींद्र गोपनारायण यांना कृषी मंत्र्यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. आत्मा एमएसीपी अंतर्गत शेतकरी सामुदायिक उत्पादन सुविधा उभारण्याकरिता कृषिरत्न फार्म व हिरकणी फार्म यांच्या प्रतिनिधींनाही धनादेशाचे वितरण करण्यात आले.खारपाणपट्टय़ाची समस्या सोडविण्यासाठी जागतिक बँकेचे साह्य-अमरावती व अकोला जिल्हय़ातील सुमारे एक हजार गावातील खारपाणपट्टय़ाची समस्या सोडविण्यासाठी जागतिक बँकेने सुमारे चार हजार कोटींचा प्रकल्प मंजूर केला आहे. या माध्यमातून खारपाणपट्टय़ातील जमिनीतील क्षार काढून जमीन सुपीक केली जाणार आहे. शेतकर्‍यांनी कोणत्याही परिस्थिती निराश होऊ नये. शासन सदैव खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहील, असा दिलासा कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांना द्यावा, अशी सूचनाही फुंडकर यांनी केली.