शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

बाजार समित्या गुंडाळणे अर्धवटपणाचा निर्णय!

By admin | Updated: January 16, 2017 01:17 IST

हमाल-मापाडी कामगारांच्या मेळाव्यात डॉ. आढाव यांचे प्रतिपादन.

अकोला, दि. १५- शेतमालाला हमीभाव देण्यासाठी उभारण्यात आलेल्या बाजार समित्या मोडीत काढण्याचा शासनाचा निर्णय अर्धवटपणाचा आहे. समित्यांमध्ये प्रचंड गुंतवणूक असल्याने त्यांच्याकडून शेतकर्‍यांना हमीभाव मिळण्यासाठीचे बंधन घालावे, समितीकडे हमी फंडाची तरतूद करावी, असे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी येथे सांगितले.विदर्भातील माथाडी कामगारांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. आढाव बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन बाजार समिती सभापती शिरीष धोत्रे यांच्या हस्ते झाले. अतिथी म्हणून अपर कामगार आयुक्त अरविंद पेंडसे, अकोला विभागीय माथाडी मंडळाचे अध्यक्ष व्ही.आर. पाणबुडे, सचिव मुंडे, प्रा. सुभाष लोमटे, कार्मिक अधिकारी दिनेश ठाकरे, हमाल-मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. हरीश धुरट, शेख हसन कादरी उपस्थित होते. यावेळी डॉ. आढाव यांनी शेतमालाला हमीभाव मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समित्यांची आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. तसेच शेतकर्‍यांनी आणलेल्या मालाची विक्री न झाल्यास त्याला तेथेच कर्जाऊ रक्कम मिळावी, यासाठी समितीकडे हमीफंडाची उभारणी करावी, असा पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले. बेरोजगारीवर मात करण्यासाठी शेती हाच पर्याय आहे. त्यामुळे शेतीला प्रथम क्रमांक मिळाला पाहिजे. त्याऐवजी शेतीचे अवनतीकरण झाले आहे. वीज आणि पाण्याची उपलब्धता उद्योगाप्रमाणे शेतीला करावी, तालुका घटक समजून पीक नियोजन करावे, त्यासाठी कृषी विद्यापीठ, बाजार समिती, पणन संस्थांनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. मेळाव्यात ठराव संमत करण्यात आले. त्यामध्ये शेतीमालाला हमीभाव देण्यासोबतच उद्योगाचा दर्जा द्या, माथाडी कायद्यानुसार लेव्ही रकमेत समानता आणा, माथाडी मंडळ अध्यक्ष, सचिवांची पूर्णवेळ नियुक्ती करा, शासकीय गोदामातील कंत्राटी पद्धत बंद करा, सामाजिक सुरक्षा कायदा लागू करा, हातावरचे पोट असणार्‍या शेतकरी, मजुरांना पेंशन योजना सुरू करा, या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातून कामगार आले. त्यामध्ये बंडू वानखडे, वाघाळकर, दिलीप काळे, दीपक चर्‍हाटकर, ईश्‍वर माळवंदे, युसूफ परसुवाले, आशीष लाव्हरे, सुरेश जगदाळे, शेख सलीम शेख मुनीर, हसन कालू चौधरी यांच्यासह कामगारांचा सहभाग होता.