शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

बाजार समित्या बंद; उन्हाळी भुईमूग, कांदा पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:18 AM

कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे ब्रेक द चेनअंतर्गत जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कडक निर्बंधांच्या काळात ...

कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे ब्रेक द चेनअंतर्गत जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कडक निर्बंधांच्या काळात जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. कृषी अवजारे, कृषी सेवा केंद्र व शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने पूर्णपणे बंद आहे. तथापि, शेतकऱ्यांना आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा घरापर्यंत तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबंधित कृषी सेवक व तालुका स्तरावर संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. बाजार समित्या बंद असल्याने माल विक्रीची अडचण निर्माण झाली आहे. उन्हाळी पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा माल घरीच पडून आहे. समोर खरीप हंगाम असल्याने शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यात माल विकता येत नसल्याने खरिपाची पेरणी करावी तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

--बॉक्स--

दररोज होती सहा-सात हजार क्विंटल आवक

कडक संचारबंदीआधी शहरातील बाजार समितीमध्ये दररोज सहा-सात हजार क्विंटल मालाची आवक होती; परंतु बाजार समिती बंद असल्याने ही आवक बंद आहे. यामध्ये हरभरा, तूर, सोयाबीनची सर्वाधिक आवक होती.

--बॉक्स--

जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याने भुईमूग व उन्हाळी सोयाबीन पडून आहे. खरिपाच्या तयारीसाठी भांडवलाची गरज आहे. माल विक्री करता येत नसल्याने अडचण होत आहे.

- किशोर नागरे, शेतकरी