शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

कुरणखेड ग्रामपंचायत सरपंचपदासाठी अनेक जण इच्छुक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:13 IST

निवडणुकीची उत्सुकता लागली असून गावातील राजकीय नेत्यांमध्ये चचार्चा सुरू झाली आहे. गावभर दवंडी देणे सुरू केले असल्याचे पाहावयास ...

निवडणुकीची उत्सुकता लागली असून गावातील राजकीय नेत्यांमध्ये चचार्चा सुरू झाली आहे. गावभर दवंडी देणे सुरू केले असल्याचे पाहावयास मिळत आहे. गावातील नागरिकसुद्धा कामचोर नेत्यांच्या कामांमुळे जागृत झाले आहेत. जशी निवडणूक जवळ येते आहे. तसे ग्राम पंचायत सदस्य आपल्या वाॅर्डात थातूरमातूर काम करण्यासाठी लगबग करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच संतापलेल्या नागरिकांच्या तोंडून चर्चासुद्धा ऐकायला मिळत आहे. प्रत्येक वाॅर्डातील गल्लीत घाण, कचरा साचला आहे. गावात नाल्यांमधील सांडपाणी तुंबून रस्त्यावर वाहत आहे. अनेक भागात रस्ते, पथदिव्यांचा अभाव आहे. यंदा विकास कामे झाले नाहीत; परंतु यंदा विकास कामांना प्राधान्य देऊ. असे विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांकडून नागरिकांना आश्वासने दिली जात आहेत; परंतु कोणी किती भ्रष्टाचार केला, कोणी विरोध केला, कोणी स्वतःचा विकास केला. हे सर्व नागरिकांच्या लक्षात आहे. सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या सर्वधर्मसमभाव, कर्तव्यदक्ष असलेल्या सुशिक्षित अशा व्यक्तींना संधी दिल्यास, त्याला पाठबळ देऊ अशी चर्चा ग्रामस्थांकडून ऐकावयास मिळत आहे. तसेच यावेळेस ग्रामपंचायत निवडणूक सरपंच व सदस्य नव्या दमाचे हवेत. अशी चर्चा नागरिक करीत आहेत. २०२१ सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याचे समजते. गावातील हेवे दावे असल्याने गावचा विकास रखडला आहे; मात्र गावचा पूर्णपणे विकास व्हावा. याकरिता जागृत जनता सरपंच पदासाठी नायक शोधत आहे.