शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

आंब्याचे दर आटोक्यात; निर्बंधांमुळे विक्री मंदावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहे. १५ मेपर्यंत सर्व बाजार बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे ...

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहे. १५ मेपर्यंत सर्व बाजार बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे व्यापाऱ्यांसोबत फळ विक्रेत्यांचा व्यवसायही ठप्प झाला आहे. या संकटाचा परिणाम आंब्याच्या दरावर झाला. हापूससोबत केशर, लालबाग, दशेरी आंब्याचे दर घटले आहेत. जिल्ह्यात रत्नागिरी हापूस आंब्याचा दर २५० ते ३५० रुपये प्रतिडझन ठोकमध्ये आहे; मात्र विक्री मंदावल्याने आंबा सडण्याच्या मार्गावर आहे. यासह हापूस (कर्नाटक)चा दर ७० ते ८० रुपये प्रतिकिलो, केशर ६०, लालबाग ३० रुपये आणि दशेरी आंब्यालाही ५० ते ६० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. दरम्यान, कोरोनामुळे कडक निर्बंध लागू झाल्याने व्यावसायिकांकडून नव्याने आंबा बोलावणे बंद झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रशासनाने १५ मेनंतर निर्बंध हटविल्यास, त्यापुढे आंबा विक्रीच्या व्यवसायाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

--बॉक्स--

विक्री ठप्प; आंब्याचे नुकसान

९ मेपर्यंत जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ असे चार तास फळ विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. या काळात अकोला शहरातील फळ विक्रेत्यांनी भरपूर प्रमाणात आंबा उपलब्ध केला; मात्र ९ मे रात्रीपासून कडक निर्बंध लागू झाले. त्यामुळे फळ विक्रीची दुकानेही बंद आहेत. यामुळे हापूससोबतच अन्य प्रजातींचा आंबाही जागेवरच सडत असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली. हापूस आंब्याची मागणी झाल्यास विक्रेत्यांनी घरपोहोच डिलिव्हरीची सोय उपलब्ध केलेली आहे. विशेषत: रत्नागिरीच्या हापूस आंब्याला अधिक मागणी आहे.

--कोट--

आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंब्याची झाडे फळांनी अधिक प्रमाणात लदबदली आहेत. कोरोनामुळे बेभाव आंबा विकावा लागत आहे; परंतु योग्य नियोजन केल्यास यावरही मात करता येते. आम्ही थेट ग्राहकांपर्यंत आंबा विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नियोजन केले आहे. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

- डॉ. विजय म्हैसने, आंबा उत्पादक

--कोट--

यावर्षी उच्चदर्जाचे गावरान आंबे आले आहेत. या आंब्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र या निर्बंधांमुळे बाजार बंद आहे. हा आंबा विक्री करावा तरी कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्ण आंबा शेतात सडण्यापेक्षा थेट ग्राहकांना विक्री करण्याचा पर्याय आहे.

- रमेश निमकंडे, आंबा उत्पादक

--कोट--

कोरोनामुळे मागील वर्षांपासून आंबा विक्रीत अडचण येत आहे. यावर्षी तरी आंब्याची विक्री होणार असे अपेक्षित होते. परंतु कडक निर्बंधांमुळे बाजार बंद आहे. आंब्याची विक्री ठप्प झाली असून, शहरातील विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात माल पडून आहे. हा आंबा सडल्यास मोठे नुकसान होईल.

- मुजाहीद खान, आंबा व्यापारी

--कोट--

दरवर्षीप्रमाणे यंदाही हापूसला ग्राहकांकडून विशेष मागणी होती. त्यानुसार, मोठ्या प्रमाणात आंब्याच्या पेट्या बोलावल्या होत्या. हापूससह केशर, दशेरी हा आंबाही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. कडक निर्बंधांमुळे विक्री बंद आहे. मालाची आवकही नाही.

- आरीफ चाँद खान, आंबा व्यापारी

--पॉईंटर--

आंब्याची होलसेल किंमत (प्रतिकिलो)

केशर ६०

लालबाग ३०

बदाम ४०

--पाॅईंटर--

हापूस (रत्नागिरी)

२५० रु.

हापूस (कर्नाटक)

८० रु.