शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आदिवासींच्या कन्यादानमध्ये मंगळसूत्र घोटाळा; ३४४ मंगळसूत्रांपैकी ४१ जोडप्यांनाच वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 12:40 IST

अकोला : आदिवासी जोडप्यांना कन्यादान योजनेतून दिल्या जाणाऱ्या सोन्याचे मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी व केलेल्या पुरवठ्यात लाखोंचा घोटाळा झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे२००५-०६ मध्ये कन्यादान योजना राबवताना घोटाळा झाल्याचे पुढे आले आहेअकोल्यातील खंडेलवाल अलंकार ज्वेलर्सने ३४४ मंगळसूत्रांचा पुरवठा केला.प्रकल्प कार्यालयातील नोंदीनुसार केवळ ४१ मंगळसूत्र आणि संसारोपयोगी वस्तूंचे वाटप झाल्याचे आढळून आले.

-  सदानंद सिरसाटअकोला : आदिवासी जोडप्यांना कन्यादान योजनेतून दिल्या जाणाऱ्या सोन्याचे मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी व केलेल्या पुरवठ्यात लाखोंचा घोटाळा झाल्याची माहिती आहे. २००५-०६ मध्ये झालेल्या या घोटाळ््यात तत्कालीन प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव, एस.व्ही. बोबडे यांच्यावर फौजदारी कारवाईची टांगती तलवार आहे. मागणी केलेल्या ३४४ पैकी ४१ मंगळसूत्रांचेच लाभार्थींना वाटप झाले. त्यासाठी २० लाखांपेक्षाही अधिक निधी खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे.शासनाने नियुक्त केलेल्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एम.के. गायकवाड यांच्या समितीचा अहवाल शासनाकडे सादर झाला आहे. त्यानुसार विविध योजनांमध्ये घोटाळा केलेल्या अधिकाºयांवर फौजदारी कारवाईचे निर्देश सध्याच्या प्रकल्प अधिकाºयांना देण्यात आले. अकोला प्रकल्पासाठी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार २००५-०६ मध्ये कन्यादान योजना राबवताना घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. ३६० ते ४०० सामूहिक विवाहासाठी त्यावर्षी अनुदान देण्यात आले. त्यावेळी मागणीनुसार अकोल्यातील खंडेलवाल अलंकार ज्वेलर्सने ३४४ मंगळसूत्रांचा पुरवठा केला. त्याची किंमत २० लाख ६४ हजार रुपये होती. तेवढ्याच संख्येत संसारोपयोगी वस्तूंचाही पुरवठा दुसºया प्रतिष्ठानकडून झाल्याची माहिती आहे. आदिवासी विकास विभागाच्या अकोला प्रकल्प कार्यालयातील नोंदीनुसार केवळ ४१ मंगळसूत्र आणि संसारोपयोगी वस्तूंचे वाटप झाल्याचे आढळून आले. त्याची किंमत अनुक्रमे ९ लाख ७१ हजार व ८ लाख २५ हजार रुपये आहे. त्यापैकी केवळ ४ लाख १० हजार रुपयांच्या मंगळसूत्रांचे वाटप झाले. त्यावेळी खर्च झालेल्या ४ लाख १० हजार रुपये वगळून ३५ लाख ८९ हजारांचे काय झाले, याची कोणतीच नोंद आदिवासी विकास विभागाकडे नाही. त्यामुळे मंगळसूत्र आणि संसारोपयोगी वस्तूंसाठी असलेल्या ३५ लाख ८९ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाºयांवर फौजदारी कारवाईची टांगती तलवार असल्याची माहिती आहे.३४३ मंगळसूत्रे गेली कुठे?अकोल्यातील खंडेलवाल अलंकार ज्वेलर्सने मागणीनुसार ३४४ मंगळसूत्रांचा पुरवठा केल्याची नोंद आहे. मात्र, कार्यालयातील वस्तू वाटप नोंदवहीनुसार केवळ ४१ जोडप्यांनाच वाटप झाले. त्यामुळे उर्वरित ३४३ मंगळसूत्रे गेली कोठे की त्याचा पुरवठाच झाला नाही, ही बाब आता फौजदारी कारवाईतून पुढे येण्याचीही शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद