शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

वन्य प्राण्यांचे व्यवस्थापन ही शासनाचीच जबाबदारी

By admin | Updated: July 31, 2015 01:47 IST

शेतकरी प्रतिनिधी व वन्य प्राणीप्रेमींचे मत, मारणे हा पर्याय नाही.

अकोला : वन्य प्राणी पिके फस्त करीत असून, यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. आधीच निसर्गाची अवकृपा व शासनाच्या उदासीन धोरणामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांवर हे संकट ओढवले आहे. शेतकर्‍यांची अवस्था वाईट असून, त्यांना या समस्येपासून मुक्ती मिळायला हवी, हे सत्य असले तरी वन्य प्राण्यांना मारणे हा पर्याय नाही. शासनाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, असा सूर 'लोकमत'च्यावतीने गुरुवारी आयोजित परिचर्चेत निघाला. शासनाने २२ जुलै रोजी शेती पिकास धोकादायक ठरलेल्या रानडुक्कर व रोही यांचा बंदोबस्त करण्याबाबतचे परिपत्रक काढले. या विषयावर ह्यलोकमतह्णच्यावतीने गुरुवारी परिचर्चा आयोजित करण्यात आली. भारतीय जनता पक्ष किसान सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, शिवाजीराव देशमुख, वन्यजीव विभागाचे अधिकारी दुबे, सामाजिक वनीकरणचे माहिती व प्रसारणप्रमुख गोविंद पांडे, विभागीय वनव्यवस्थापन समितीचे सल्लागार नीलेश डेहणकर, मानद वन्यजीव संरक्षक देवेंद्र तेलकर यांची उपस्थिती होती.या परिपत्रकामध्ये शासनाने रानडुक्कर किंवा रोही या वन्य प्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकर्‍यांनी संबंधित वनक्षेत्रपाल यांच्याकडे अर्ज देऊन पोचपावती प्राप्त करावी. उपरोक्त तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित वनक्षेत्रपाल यांनी शहानिशा करून रानडुक्कर किंवा रोही पारध करण्याबाबत परवाना २४ तासांच्या आत निर्गमित करावा, जर २४ तासांच्या आत परवाना दिला नाही किंवा नाकारला नाही, तर अर्जदाराला परवाना देण्यात आलेला आहे, असे गृहित धरून पारध करण्याची मुभा राहील, असे नमूद केले आहे. यावर मत व्यक्त करताना यावेळी शेतकरी प्रतिनिधींच्यावतीने शासनाने शेतकर्‍यांना वन्य प्राण्यांची पारध करण्याची परवानगी दिली असली तरी, हे काम शासनाचे असून, शासनानेच करावे, अशी भूमिका मांडली, तर वनविभागाचे अधिकारी व वन्य प्राणीप्रेमींनी वन्य प्राण्यांना मारणे हा पर्यायच नसून, त्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत मांडले.