शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

अभयारण्याच्या विकासासाठी ‘मॅनेजमेंट प्लॅन’

By admin | Updated: September 15, 2014 01:50 IST

१५ वर्षांचे नियोजन, इको टूरिझमवर भर

विवेक चांदूरकर /अकोलाविभागातील अभयारण्याचा विकास, पर्यटनात वाढ व पुढील १५ वर्षांचे नियोजन करण्यासाठी वन विभागाच्या वतीने व्यवस्थापन आराखडा (मॅनेजमेंट प्लॅन) तयार करण्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे. अभयारण्यांमध्ये पर्यटन कसे वाढेल, यावर या आराखड्यात विशेष भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात अकोला आणि आकोट वनविभागांतंर्गत कोटपूर्णा, ज्ञानगंगा आणि नरनाळा अभयारण्य येते. या अभयारण्यांचा विस्तार पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यांसह अमरावती जिल्ह्यातही झाला आहे. काटेपूर्णा अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार झाला असून, सध्या वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात पसरलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. प्रत्येक १५ वर्षांंनी वनविभागाच्या वतीने अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो. काटेपूर्णा, ज्ञानगंगा या अभयारण्याचा आराखडा २0१४ मध्ये संपुष्टात येणार असल्याने, २0१४-१५ चा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये अभयारण्यातील झाडे, झुडूपे, वेली तसेच रोपट्यांची संख्या, घनता व सध्याची स्थिती यासंदर्भातील सर्वच माहिती गोळा करण्यात येते. जंगलातील तृणभक्षी, मांसभक्षी प्राणी, त्यांची संख्या व पुढील १५ वर्षांनी तद्विषयक स्थिती काय राहील, याची संपूर्ण माहिती गोळा करण्यात येते. त्यानंतर या अभयारण्यात पुढील १५ वर्षे कोणती कामे करावी, झाडांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचे नियोजन करण्यात येते. या अभयारण्यात दररोज किती पर्यटकांना प्रवेश द्यावा, त्यांच्या राहण्याची, सुरक्षेची व्यवस्था तसेच पर्यटनवाढीसाठी नवीन उपाययोजना कोणत्या करता येईल, यावर भर देण्यात येणार आहे.