शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्याच्या विकासासाठी ‘मॅनेजमेंट प्लॅन’

By admin | Updated: September 15, 2014 01:50 IST

१५ वर्षांचे नियोजन, इको टूरिझमवर भर

विवेक चांदूरकर /अकोलाविभागातील अभयारण्याचा विकास, पर्यटनात वाढ व पुढील १५ वर्षांचे नियोजन करण्यासाठी वन विभागाच्या वतीने व्यवस्थापन आराखडा (मॅनेजमेंट प्लॅन) तयार करण्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे. अभयारण्यांमध्ये पर्यटन कसे वाढेल, यावर या आराखड्यात विशेष भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात अकोला आणि आकोट वनविभागांतंर्गत कोटपूर्णा, ज्ञानगंगा आणि नरनाळा अभयारण्य येते. या अभयारण्यांचा विस्तार पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यांसह अमरावती जिल्ह्यातही झाला आहे. काटेपूर्णा अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार झाला असून, सध्या वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात पसरलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. प्रत्येक १५ वर्षांंनी वनविभागाच्या वतीने अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो. काटेपूर्णा, ज्ञानगंगा या अभयारण्याचा आराखडा २0१४ मध्ये संपुष्टात येणार असल्याने, २0१४-१५ चा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये अभयारण्यातील झाडे, झुडूपे, वेली तसेच रोपट्यांची संख्या, घनता व सध्याची स्थिती यासंदर्भातील सर्वच माहिती गोळा करण्यात येते. जंगलातील तृणभक्षी, मांसभक्षी प्राणी, त्यांची संख्या व पुढील १५ वर्षांनी तद्विषयक स्थिती काय राहील, याची संपूर्ण माहिती गोळा करण्यात येते. त्यानंतर या अभयारण्यात पुढील १५ वर्षे कोणती कामे करावी, झाडांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचे नियोजन करण्यात येते. या अभयारण्यात दररोज किती पर्यटकांना प्रवेश द्यावा, त्यांच्या राहण्याची, सुरक्षेची व्यवस्था तसेच पर्यटनवाढीसाठी नवीन उपाययोजना कोणत्या करता येईल, यावर भर देण्यात येणार आहे.