शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अभयारण्याच्या विकासासाठी ‘मॅनेजमेंट प्लॅन’

By admin | Updated: September 15, 2014 01:50 IST

१५ वर्षांचे नियोजन, इको टूरिझमवर भर

विवेक चांदूरकर /अकोलाविभागातील अभयारण्याचा विकास, पर्यटनात वाढ व पुढील १५ वर्षांचे नियोजन करण्यासाठी वन विभागाच्या वतीने व्यवस्थापन आराखडा (मॅनेजमेंट प्लॅन) तयार करण्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे. अभयारण्यांमध्ये पर्यटन कसे वाढेल, यावर या आराखड्यात विशेष भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात अकोला आणि आकोट वनविभागांतंर्गत कोटपूर्णा, ज्ञानगंगा आणि नरनाळा अभयारण्य येते. या अभयारण्यांचा विस्तार पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यांसह अमरावती जिल्ह्यातही झाला आहे. काटेपूर्णा अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार झाला असून, सध्या वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात पसरलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. प्रत्येक १५ वर्षांंनी वनविभागाच्या वतीने अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो. काटेपूर्णा, ज्ञानगंगा या अभयारण्याचा आराखडा २0१४ मध्ये संपुष्टात येणार असल्याने, २0१४-१५ चा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये अभयारण्यातील झाडे, झुडूपे, वेली तसेच रोपट्यांची संख्या, घनता व सध्याची स्थिती यासंदर्भातील सर्वच माहिती गोळा करण्यात येते. जंगलातील तृणभक्षी, मांसभक्षी प्राणी, त्यांची संख्या व पुढील १५ वर्षांनी तद्विषयक स्थिती काय राहील, याची संपूर्ण माहिती गोळा करण्यात येते. त्यानंतर या अभयारण्यात पुढील १५ वर्षे कोणती कामे करावी, झाडांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचे नियोजन करण्यात येते. या अभयारण्यात दररोज किती पर्यटकांना प्रवेश द्यावा, त्यांच्या राहण्याची, सुरक्षेची व्यवस्था तसेच पर्यटनवाढीसाठी नवीन उपाययोजना कोणत्या करता येईल, यावर भर देण्यात येणार आहे.