शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण घटले!

By admin | Updated: February 4, 2016 01:28 IST

मलेरिया, डेंग्यू निदानासाठी ३ लाख ४२ हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासले!

अकोला: कीटकजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी हिवताप विभागाकडून दरवर्षी ग्रामीण व शहरी भागामध्ये नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासले जातात. २0१५ डिसेंबरअखेरपर्यंत हिवताप विभागाने ३ लाख ४२ हजार ७६५ नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासले. यामध्ये केवळ १७९ जणांना मलेरिया आणि १७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे दिसून आले. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण घटले आहेत. जिल्हय़ात मलेरिया, डेंग्यूचा पादुर्भाव वाढू नये. यासाठी हिवताप विभागातर्फे दरवर्षी ग्रामीण व शहरी भागामध्ये तपासणी मोहीम राबविण्यात येते. तसेच डबक्यांमध्ये गप्पी मासेसुद्धा सोडण्यात येतात. शहरी व ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर हिवताप विभागाने फॉगिंग मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात एक फॉगिंग मशीन आणि शहरात सात फॉगिंग मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या माध्यमातून ठिकठिकाणी फवारणीसुद्धा करण्यात येते. गतवर्षी २८ गावांमध्ये फवारणी करण्यात आली होती. तीन वर्षांंपूर्वी दहा ठिकाणी मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचा उद्रेक झाला होता. त्यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला; परंतु वर्षभरापासून जिल्हय़ात मलेरिया, डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यात हिवताप विभागाला यश आले आहे. साठलेल्या किंवा साठवलेल्या पाण्यामध्ये एडीस इजिप्टाय नामक विषाणूची उत्पत्ती होत असल्याने, डासांचे प्रमाण वाढते आणि मलेरिया, डेंग्यूसारखे आजार पसरतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी हिवताप विभागाकडून प्रयत्न करण्यात येतात.