शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालकांच्या तोंडचा घासही हिरावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:53 IST

कुपोषणाने बाल-माता मृत्यू होऊ नये, यासाठी  असलेली पोषण आहार योजना, तसेच ग्राम बालविकास केंद्रातील  उपचार योजना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण  विभागाने राबवलीच नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  सेसफंडातील २५ लाख अखर्चित ठेवण्यात आला, तर जिल्हा  वार्षिक योजनेतील १५ पैकी १२ लाख शासनजमा करण्याची  तयारी सुरू आहे. महिला व बालकल्याण विभागाची दिरंगाई  जिल्हय़ातील कुपोषित बालके, स्तनदा माता, गरोदर महिलांच्या  जीवावर उठली आहे, हे विशेष.

ठळक मुद्देग्राम बालविकास केंद्रात आहाराचा निधी जाणार परतअतितीव्र आणि तीव्र कुपोषित बालकांचा निधी

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कुपोषणाने बाल-माता मृत्यू होऊ नये, यासाठी  असलेली पोषण आहार योजना, तसेच ग्राम बालविकास केंद्रातील  उपचार योजना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण  विभागाने राबवलीच नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  सेसफंडातील २५ लाख अखर्चित ठेवण्यात आला, तर जिल्हा  वार्षिक योजनेतील १५ पैकी १२ लाख शासनजमा करण्याची  तयारी सुरू आहे. महिला व बालकल्याण विभागाची दिरंगाई  जिल्हय़ातील कुपोषित बालके, स्तनदा माता, गरोदर महिलांच्या  जीवावर उठली आहे, हे विशेष.ग्रामीण आणि डोंगरी भागातील 0 ते ६ वर्षे वयोगटातील बालके,  स्तनदा माता, गरोदर स्त्रिया यांच्या कुपोषणावर उपाय म्हणून त्यांना  सूक्ष्म प्रथिने पुरवठा करण्याची योजना जिल्हा परिषदेच्या सेसफंडा तून तसेच शासन निधीतून दरवर्षी राबवावी लागते. त्यासाठी  महिला व बालकल्याण समितीने सातत्याने तरतूद केली, खर्चाचे  नियोजनही केले; मात्र विभागाने कुपोषणमुक्तीची ही योजना गेल्या  तीन वर्षांपासून राबवलीच नसल्याचा प्रकार उघड झाला आहे.  त्यातच चालू वर्षात महिला व बालकल्याण समितीने २५ लाख रु पये तरतूद करून पौष्टिक आहार पुरवठय़ाची तयारी केली आहे.  त्याला समितीच्या मंजुरीनंतर तांत्रिक मंजुरीही मिळाली आहे; मात्र  त्याची अंमलबजावणी अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे  एकीकडे लाखो रुपये निधी जिल्हा परिषदेकडे पडून आहेत, तर  दुसरीकडे अकोट, तेल्हारा तालुक्यातील पुनर्वसित गावांमध्ये कु पोषित बालकांचे बळी जात असल्याचे चित्र आहे. अकोट तालु क्यातील गावांमध्ये कुपोषित बालकांच्या मृत्यूच्या घटनांनी जिल्हा  हादरला. त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाने अकोट येथील  महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला अहवाल  मागविला आहे. 

अतितीव्र आणि तीव्र कुपोषित बालकांचा निधीज्या गावांमध्ये अतितीव्र आणि तीव्र कुपोषित बालकांची ओळख  पटल्यानंतर त्या गावात ग्राम बालविकास केंद्रात त्यांच्यावर उपचार  केले जातात. औषधोपचार आणि अतिरिक्त पौष्टिक आहारासाठी  प्रतिबालक बाराशे रुपये खर्च केला जातो. त्यासाठी नियोजन  विभागाने नावीन्यपूर्ण योजनेतून २0१५-१६ मध्ये जिल्हा परिषदेला  १५ लाख ५७ हजार रुपये निधी दिला. तो खर्चच न झाल्याने  पुढील वर्षातही निधी मिळालेला नाही. मार्च २0१७ अखेरपर्यंत  त्यापैकी तीन लाख खर्च झाल्याची माहिती आहे, तर उर्वरित १२  लाख ५७ हजार शासनाला परत करण्याची तयारी सुरू आहे. 

तत्कालीन सीईओंनी ठेवली फाइल पेंडिंगमहिला व बालकल्याण विभागाने ग्राम बालविकास केंद्राचा निधी  खर्च करण्याची फाइल तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी  अरुण विधळे यांच्याकडे सादर केली. त्यांनी ती पेंडिंग ठेवल्याचे  सांगण्यात येत आहे.

सभापतींनी विचारला जाबचालू वर्षातही त्या योजनेची प्रक्रिया सुरू न करण्याचा प्रकारही  अधिकारी-कर्मचार्‍यांकडून केला जात आहे. ही बाब पाहता  महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांनी २२ जून रोजी  विभागाला पत्र देत जाब विचारला होता.