शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक, आर्थिक विकासासाठी कायदा करा!

By admin | Updated: July 16, 2017 02:42 IST

शंकरअण्णा धोंडगे- कर्जमाफी हवीच; ९ आॅगस्टपासून शेतकरी सुरक्षा अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : संपूर्ण कर्जमाफी तर हवीच; पण त्याचबरोबर शेतमालाला हमीभाव तसेच शेतकरी, शेतमजुरांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी सुरक्षा कायदा करा, या पाच मागण्यांसाठी येत्या ९ आॅगस्टपासून सेवाग्राम येथून शेतकरी सुरक्षा अभियान सुरू करण्यात येणार आहे. शासनाने या मागण्या मान्य न केल्यास सरकारविरोधात असहकार आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा किसान मंचचे प्रदेश निमंत्रक शंकरअण्णा धोंडगे यांनी शनिवारी येथे दिला. किसान मंचचे आंदोलन काय असेल, याची माहिती त्यांनी सर्किट हाउस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कर्जमाफीच्या मागणीवर सुकाणू समितीच्या नाशिक येथील बैठकीनंतर सरसकट कर्जमुक्तीचा प्रश्न प्रकर्षाने पुढे आला; पण सुकाणू समितीने घाई करू नये, असे आमचे मत होते. शासनाने केलेली कर्जमाफी आम्हाला मान्य नसल्याने पुन्हा नव्याने शेतकरी आंदोलन, चळवळीची मांडणी करू न संयुक्तपणे या चळवळीला पुढे नेण्यासाठी किसान मंच स्थापन करण्यात आला आहे. या मंचात कोणीही अध्यक्ष नसून, निमंत्रक व कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची आस्था असेल, त्यांना या मंचात प्रवेश राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दुष्काळ, नापिकी, सरकारी धोरणामुळे शेतमालाचे भाव पडले आहेत. यामुळे राज्यातील शेतकरी, शेतमजूर आर्थिक संकटात सापडला असून, आत्महत्या करीत आहेत. या शेतकऱ्यांना कोणत्याही शर्ती, अटी, निकष न लावता संपूर्ण कर्जातून मुक्त करावे, ही आमची मागणी आहे; परंतु कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न निकाली निघतील, असे वातावरण निर्माण केले जात आहे. याला आमचा ठाम विरोध आहे. कर्जमाफीसोबतच शेतमालाला हमीभाव मिळणे तेवढेच आवश्यक आहे. यासाठी वैधानिक अधिकार असलेली यंत्रणा शासनाने उभी करू न शेती व्यवसायालासुद्धा नफा मिळेल, असे धोरण आखावे, हमीभावापेक्षा बाजारभाव कमी झाल्यास शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळावी, राज्यात व्यावसायिक, उद्योजक, कारखानदार तसेच व्यापाऱ्यांना त्यांच्या तारण वस्तूच्या मूल्यांकनाच्या (रेडीरेकनेर) ७० टक्के प्रमाणात बँका ऋण देतात, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीच्या मूल्यांकनानुसार ७० टक्के कर्ज देण्यात यावे, शेतकरी, शेतमजूर कष्ट करू न अन्नधान्याच्या निर्मितीतून सर्वांचे पोषण करतो, त्यांनाही सुरक्षेचा अधिकार मिळावा, यासाठी शेतकरी, शेतमजुरांना आर्थिक, सामाजिक सुरक्षा कायदा करू न त्यांचे उत्पन्न किमान श्रेणीच्या कर्मचाऱ्यांइतके सुरक्षित करावे, बेरोजगारांना मानधन देण्यात यावे, या किसान मंचच्या पाच मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले. किसान मंचच्यावतीने हे पाच ठराव घेण्यात आले आहेत. यासाठी सेवाग्राम येथून सुरक्षा अभियान सुरू करण्यात येत आहे. २ आॅक्टोबर रोजी नाशिक येथे अभियानाचा समारोप होईल. तत्पूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत या मागण्यांची शासनाने पूर्तता करावी, अन्यथा राज्यातील शेतकरी, शेतमजूर, युवकांच्यावतीने २ आॅक्टोबरपासून सरकारच्याविरोधात असहकार आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा त्यांनी इशारा दिला. पत्रकार परिषदेला अमरावती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच शेतकरी जागर मंचचे अकोला जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, जगदीश मुरू मकार, ज्ञानेश्वर सुलताने, शिवाजीराव मसने, ज्ञानेश्वर माळी, दीपक गावंडे आदींची उपस्थिती होती.

- अकोल्यात शेतकरी जागर मंच, किसान मंचासोबत

   अकोला जिल्ह्यात शेतकरी जागर मंच या विषयावर किसान मंचासोबत आहे. शनिवारी या विषयावर जागर मंचचे सर्व पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.