शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

गरजेनुसार बदल करा, अन्यथा शाळा बंद पडतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:30 IST

अकोला : मुलांच्या मेंदूशी नैसर्गिकरीत्या जुळणार्‍या, त्यांच्या वयोमानाला अनुसरून आणि वेगवेगळय़ा रचनावादी शिक्षणाच्या पद्धतीनुसार मुलांना शिकवावे, मुक्त आणि मोकळे वातावरण असेल, तर मुले विश्‍वासाने शिकतात. आनंदातून आणि विधायक वातावरणात शिक्षण द्यावे, शाळांनी गरजेनुसार शिक्षणात बदल केला नाही, तर २0३0 पर्यंत शाळा बंद पडतील आणि शिक्षणाचे बाजारीकरण करणार्‍या शाळांचे पीक सुरू होईल, अशी भीती पुणे येथील प्रा. रमेश पानसे यांनी येथे व्यक्त केली.

ठळक मुद्देप्रा. रमेश पानसे यांचे मत बाबूजी देशमुख वाचनालयाची नवरात्र व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुलांच्या मेंदूशी नैसर्गिकरीत्या जुळणार्‍या, त्यांच्या वयोमानाला अनुसरून आणि वेगवेगळय़ा रचनावादी शिक्षणाच्या पद्धतीनुसार मुलांना शिकवावे, मुक्त आणि मोकळे वातावरण असेल, तर मुले विश्‍वासाने शिकतात. आनंदातून आणि विधायक वातावरणात शिक्षण द्यावे, शाळांनी गरजेनुसार शिक्षणात बदल केला नाही, तर २0३0 पर्यंत शाळा बंद पडतील आणि शिक्षणाचे बाजारीकरण करणार्‍या शाळांचे पीक सुरू होईल, अशी भीती पुणे येथील प्रा. रमेश पानसे यांनी येथे व्यक्त केली. बाबूजी देशमुख वाचनालयातर्फे प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित नवरात्र व्याख्यानमालेत मंगळवारी परिवर्तनासाठी नवा शिक्षण व्यवहार विषयावर व्याख्यान देत होते. यावेळी विचारपीठावर प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. नारायण कुळकर्णी कवठेकर, प्रा. सुरेश राऊत, वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र होते. प्रा. पानसे यांनी मुलांना मुलांसारखे वागू द्यावे, त्यांना पालकांनी समजून घ्यावे, सध्याची मुले मुळातच हुशार आहेत. मुलांचे मालक म्हणून पालकांनी वागू नये, मुले ही भावी काळाची गुंतवणूक आहे, हा समज चुकीचा आहे. मुले ही मूलभूत हक्क असलेली स्वतंत्र व्यक्ती आहे, असे सांगत प्रा. पानसे म्हणाले, की मुलांना सर्वात जास्त शिकायला आवडते; परंतु सध्या शाळा आणि पालक मुलांना आवडीचे शिक्षण देण्यापेक्षा त्यांच्यावर शिक्षण लादत आहेत. शिकणे आणि शिकवण्याचे वातावरण कसे आहे, यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत. मुक्त आणि मोकळे वातावरण असेल, तर मुले विश्‍वासाने शिकतात. मुलांच्या भावना समजून त्यांना प्रतिसाद देणे हे महत्त्वाचे आहे. मुलांना काही येत नाही म्हणून पालकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, असे सांगत त्यांनी सध्या इंग्रजी शाळांकडे कल वाढला आहे; परंतु आयएएस झालेल्या मुलांपैकी एकही इंग्रजी शाळेत शिकलेला नव्हता, असा दाखला देत त्यांनी मुलांना मराठी भाषेतच शिकू द्या, इंग्रजी शाळांमधील मुलांना धड इंग्रजीही येत नाही आणि मराठीही नाही. सेमी इंग्रजी हे पालकांना फसवण्याचे साधन झाले आहे. मुलांना विचार करायला लावणे, कल्पना करायला लावणे, दुसर्‍यांच्या भावनांशी जुळवून घ्यायला शिकवावे आणि पालकांनी भावनांवर नियंत्रण ठेवावे, शाळेत शिकताना त्याला जात, धर्म शिकवू नये, असेही प्रा. रमेश पानसे यांनी सांगितले. 

भारत तरुणांचा देश२0२५ मध्ये भारतातील तरुणांचे वयोमान सरासरी २९ असेल. जगात तरुणांचा देश म्हणून भारताकडे पाहिल्या जात आहे. त्यामुळे परिपूर्ण तरुण घडविणारे शिक्षण त्यांना द्यावे लागेल. शिक्षणात आमूलाग्र बदल करून शिक्षणाची संधी आणि दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे, असे सांगत प्रा. रमेश पानसे यांनी रोजगाराची संधी तरुणांना मिळाली नाही, तर देश कोसळेल, असा इशारा दिला.