शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख जिल्हा मार्गांनाही दुर्लक्षाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:35 IST

अकोला : देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या म्हणवल्या  जाणार्‍या रस्त्यांकडे मात्र विकासाच्या झंझावातात किती  दुर्लक्ष केले जात आहे, याचा प्रत्यय अकोला जिल्ह्यातील  हजारो किमीच्या रस्त्यांची कामेच सुरू झाली नसल्याच्या  माहितीतून पुढे येत आहे. जिल्हा परिषदेकडे १५00 किमी,  तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३७५ किमीपेक्षाही  अधिक किमी रस्त्यांची निर्मिती होणे बाकी आहे. त्यामध्ये  प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्गांचा समावेश आहे. 

ठळक मुद्देसा. बां. विभागाकडे ३७५ किमीचे रस्ते मिसिंग!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या म्हणवल्या  जाणार्‍या रस्त्यांकडे मात्र विकासाच्या झंझावातात किती  दुर्लक्ष केले जात आहे, याचा प्रत्यय अकोला जिल्ह्यातील  हजारो किमीच्या रस्त्यांची कामेच सुरू झाली नसल्याच्या  माहितीतून पुढे येत आहे. जिल्हा परिषदेकडे १५00 किमी,  तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३७५ किमीपेक्षाही  अधिक किमी रस्त्यांची निर्मिती होणे बाकी आहे. त्यामध्ये  प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्गांचा समावेश आहे. अकोला जिल्हा रस्ते विकास योजनेनुसार जिल्ह्यात एकूण  ४७६६ किमीचे रस्ते निर्मिती अपेक्षित आहे. २00१ ते २0२१  या कालावधीतील विकास योजनेनुसार आतापर्यंत त्यापैकी  जवळपास सर्वच रस्त्यांची कामे होणे अपेक्षित असताना  जिल्हा परिषदेकडे असलेल्या तब्बल १४९५ किमीच्या रस् त्यांना अद्याप हातच लागलेला नाही. जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने त्या रस्त्यांची  जोडणी करण्यासाठी दमबाज पाठपुरावा केल्याचे उदाहरण  नाही. त्यामुळे केवळ अकोला शहराला जोडणारा रस्ता  आहे, म्हणजे झाले, या मानसिकतेत असलेल्या ग्रामस्थांना  एका गावातून दुसर्‍या गावांना जोडणार्‍या रस्त्यांची गरज  आहे, याची अद्याप गरज वाटलेली नाही. त्यामुळेच शासन,  लोकप्रतिनिधी त्यांना माहिती नसल्याचा आनंद उपभोगत  आहेत. जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी ६२४ किमी आहे.  त्यापैकी ३१६ किमीचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाने  अस्तित्वात आणले, तर २४४ किमीचे रस्ते जिल्हा परिषदेने  केले. त्यापैकी ६४ किमीच्या रस्त्यांना अद्याप हात लागलेला  नाही. राज्य मार्गांची लांबी ७३४ किमी आहे, त्यापैकी  बांधकाम विभागाने ६६३, तर जिल्हा परिषदेने २0 किमीचे  रस्ते केले. त्यातील ४८ किमी रस्ते निर्मिती झालेली नाही. इ तर जिल्हा मार्गाची लांबी १0९४ किमी आहे, जिल्हा  परिषदेने त्यापैकी ८३0 किमीची निर्मिती केली. २६३ किमी  अद्यापही बाकी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे  असलेल्या या तीनही प्रकारातील रस्त्यांपैकी ३७५ किमी रस् त्याची कामे मिसिंग आहेत. ती करण्यासाठी शासन, लोकप्र ितनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेची  यंत्रणा किती सजग आहे, हे गेल्या काही वर्षातील नवीन  कामांच्या वेगातून दिसून येत आहे.