शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

मेजर ध्यानचंद हेच भारतरत्नचे पहिले दावेदार!

By admin | Updated: January 12, 2015 01:42 IST

फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांचे मत

अकोला: क्रीडा क्षेत्रातून भारतरत्न हा मानाचा पुरस्कार क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरला देण्यात आला. त्याला माझा विरोध नाही; मात्र क्रीडा क्षेत्रातून या पुरस्कारासाठी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद हेच पहिले दावेदार होते, असे मत फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.रविवारी आयोजित वॉकथॉन स्पर्धेसाठी अकोल्यात आलेले मिल्खा सिंग यांनी ह्यलोकमतह्णशी संवाद साधताना खेळाडूंचे कर्तव्य व जबाबदार्‍या यावर प्रकाश टाकला.

प्रश्न: सचिन तेंडूलकरला मिळालेल्या भारतरत्न पुरस्काराबद्दल आपलं मत काय? सचिनला भारतरत्न देण्याबाबत माझी काहीच हरकत नाही; मात्र क्रीडा क्षेत्रातून जर भारतरत्न पुरस्कार द्यायचाच होता तर सर्वप्रथम तो मेजर ध्यानचंद यांना द्यायला हवा होता. मेजर ध्यानचंद यांचे देशाच्या क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठे आहे. सचिनला नंतरही हा पुरस्कार देता आला असता. प्रश्न : या पुरस्काराच्या निकषाबद्दल तुमचे मत काय आहे? भारतरत्न पुरस्कार देताना त्या व्यक्तीने देशाप्रती दिलेले योगदान बघणे गरजेचे आहे. कुणाचे किती योगदान आहे, यावर पुरस्काराचे मापदंड ठरायला हवे. त्या खेळाडूनचा देशाच्या क्रीडा क्षेत्रास किती फायदा झाला, हे बघणे गरजेचे आहे. केवळ खेळाडूची लोकप्रियता बघणे योग्य नाही. प्रश्न : तुम्हाला भारतरत्न द्यायला हवा होता का? मी माझ्यावतीने मला भारतरत्न द्या, अशी मागणी कधीच करणार नाही; मात्र मी त्या पुरस्काराच्या योग्यतेचा आहे, असे शासनाला वाटले तर शासन मला पुरस्कार देईल. हे शासनाने ठरवायला हवे. मी माझ्याकडून कोणतीही मागणी करणार नाही. कोणत्याही खेळाडूने कधीच कोणत्या पुरस्काराची मागणी करू नये. आपण त्या पुरस्काराच्या योग्य असलो तर पुरस्कार मिळतातच. प्रश्न : खेळाडूंच्या आयुष्याविषयी तुम्हाला काय वाटते? खेळाडूंनी खेळत राहायला हवे. पदकाची अपेक्षा असली तरी, तेच मूळ ध्येय असायला नको. खेळण्यामुळे विविध आजार दूर पळतात व आरोग्य चांगले राहते.