शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

मजीप्राचा महापालिकेवर २३० काेटींचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:25 IST

अकाेला : तत्कालीन नगरपरिषदेच्या कालावधीपासून ते २००६ पर्यंत शहरवासीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाणीपुरवठा केला. याकालावधीत महापालिकेने ४७ काेटींची पाणीपट्टी ...

अकाेला : तत्कालीन नगरपरिषदेच्या कालावधीपासून ते २००६ पर्यंत शहरवासीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाणीपुरवठा केला. याकालावधीत महापालिकेने ४७ काेटींची पाणीपट्टी व देखभाल दुरुस्तीचा भरणा न केल्याचा दावा करीत मजीप्राने व्याज व विलंब आकारासह मनपावर २३० काेटींचा दावा दाखल केला. मनपाने हा दावा फेटाळून लावल्याने प्रकरण नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ट झाले. दरम्यान, यातून मार्ग काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्यस्थ नियुक्त करण्यात आले. याविषयी मंगळवारी मुंबईत मजीप्राच्या सदस्य सचिवांसाेबत भाजप लाेकप्रतिनिधींची बैठक पार पडली.

मनपाची आर्थिक स्थिती बिकट असतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दावा केलेल्या २३० काेटींचे प्रकरण समाेर आले आहे. हा दावा मनपा प्रशासनाने फेटाळून लावला असून, सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे. याप्रकरणी न्यायालयाने मध्यस्थीसाठी निवृत्त न्यायाधीश पुराेहित यांची नियुक्ती केली. त्या अनुषंगाने मंगळवारी मुंबईत मजीप्राचे सदस्य सचिव, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, माजी महापाैर विजय अग्रवाल यांची ऑफलाइन बैठक पार पडली असून, महापालिका आयुक्त निमा अराेरा, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एच.जी. ताठे, कनिष्ठ अभियंता शैलेश चाेपडे यांची ऑनलाइन उपस्थिती हाेती.

काय आहे प्रकरण?

तत्कालीन नगरपरिषदेच्या कालावधीपासून ते २००६पर्यंत शहराला मजीप्राच्या यंत्रणेने पाणीपुरवठा केला. सप्टेंबर २००१ मध्ये मनपा अस्तित्वात आल्यानंतर पाणीपट्टीची व देखभाल दुरुस्तीची रक्कम मजीप्राला देणे भाग हाेते. ही थकबाकी ४७ काेटी हाेती. ही रक्कम मिळत नसल्यामुळे मजीप्राने ४७ काेटींच्या रकमेसह आकारलेले व्याज, विलंब आकार (१५५ काेटी ३५ लक्ष) तसेच हुडकाे व आयुर्विमाच्या (२७.६५ काेटी) कर्जापाेटी २३० काेटी रुपये झाले.

..असा आहे मनपाचा प्रतिदावा

मजीप्राकडून याेजना हस्तांतरण करताना मनपाने २० काेटी ५० लक्ष रुपयांचा मजीप्राकडे भरणा केला हाेता. तसेच ३० काेटी ७२ लक्ष रुपये (१ टक्का मुद्रांक शुल्क) परस्पर वळती केले. त्यामुळे मजीप्राने आकारलेले व्याज व विलंब आकारापाेटी १५५ काेटी ३५ लक्षची रक्कम माफ करण्याची मनपाची मागणी आहे.

शासनाने मुद्रांक शुल्काचे ३० काेटी ७२ लक्ष रुपये मजीप्राकडे वळती केले. यापैकी २१ काेटी ५० लक्ष प्राप्त झाले असून, उर्वरित रक्कम अप्राप्त असल्याचे मजीप्राचे म्हणने आहे. हा तिढा लवकरच निकाली काढला जाईल.

-रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तथा आमदार भाजप