शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

महायुतीतील घटक पक्षांच्या पदरी येणार निराशाच!

By admin | Updated: September 17, 2014 00:50 IST

पश्‍चिम विदर्भातील जागा मिळण्याची शक्यता कमीच

अनिल गवई / खामगावपश्‍चिम विदर्भातील काही जागांवर महायुतीतील घटक पक्षांनी दावा ठोकला असला तरी, यापैकी एकही जागा घटक पक्षांसाठी न सोडण्याची भूमिका महायुतीतील प्रमुख पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे जागांच्या अपेक्षेने महायुतीत सहभागी झालेल्या घटक पक्षांचा हिरमोड होणार असल्याचे चित्र दिसत आहे.भाजप-सेना महायुतीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक घटक पक्षाच्या अपेक्षा वेगळ्या असल्या तरी, उद्देश मात्र एकच आहे. काही तरी पदरात पाडून घेण्यासाठीच महायुतीचा डोलारा उभा राहीला आहे. ही वस्तुस्थिती असून प्रत्येक घटक पक्षाने राज्यातील आपल्या प्रभावानुसार जागांची मागणी केली आहे. लोकसभेतील यशाने प्रत्येक घटक पक्षाच्या अपेक्षा उंचावल्या असून, त्यांनाही सत्तेत वाटा हवा असल्यामुळे कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या ठिकाणी घटक पक्षाने दावा ठोकला आहे. पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दावा ठोकला आहे. अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरसह वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तसेच बाळापूर मतदारसंघावर रिपाइंच्या आठवले गटाने दावा ठोकला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघासाठी शिवसंग्रामनेही धडपड चालविली आहे; मात्र जागा वाटपावरून भाजप-शिवसेना युतीतच निर्माण झालेली तेढ आणि पश्‍चिम विदर्भातील बहुतांश जागांवर भाजप-सेनेचे असलेले वर्चस्व, या कारणांमुळे घटक पक्षाच्या वाट्याला पश्‍चिम विदर्भात निराशाच येणार असल्याची माहिती समोर येत आहे.पश्‍चिम विदर्भातील अकोला-बुलडाणा-वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील राखीव मतदारसंघांमध्ये भाजप-सेना युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे या जागांसाठी खा. आठवलेंनी केलेली मागणी पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान खा.आठवले हे बुलडाण्याला आले असता त्यांनी मेहकर मतदार संघ रिपाइंला सोडण्याची मागणी केली. विद्यमान आमदारांच्या विरोधातील जात प्रमाणपत्राचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणत त्यांनी मेहकर मधून रिपाइं ने त्यांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. त्यामुळे जागा वाटपात रिपाइंला मेहकरची आशा असली तरी जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.