शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

महावितरणचा रोहित्र बदलण्याचा धडाका

By admin | Updated: December 8, 2014 01:08 IST

अमरावती विभागातील ३६0 रोहित्र बदलली.

अकोला : गत एक वर्षापासून रोहित्र जळण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी शेतकरी पाण्याची सोय असल्यावरही सिंचन करू शकत नाहीत. आधीच दुष्काळ, त्यात भारनियमनाच्या संकटाने त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांच्या या मुद्याची राजकीय पुढार्‍यांनी गंभीर दखल घेत महावितरणला त्वरित रोहित्र बदलवून देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे महावितरणने त्वरित पावले उचलीत रोहित्र बदलण्याचा धडाका लावला असून, अमरावती विभागातील ३६0 रोहित्रे बदलली आहेत. उर्वरित रोहित्र दोन ते तीन दिवसांत बदलण्यात येणार आहे. सध्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू असल्यामुळे पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे कृषिपंपांचा वापर वाढला आहे. मंजुरीच्या क्षमतेनुसार कृषिपंप सुरू असल्यास रोहित्रे जळण्याची शक्यता फार कमी असते; परंतु मंजूर भारापेक्षा जास्त क्षमतेची मोटर लावल्यास रोहित्रावर ताण येतो व रोहित्र जळते. जळालेले रोहित्र महिनोमहिने बदलण्यात येत नव्हते. त्यामुळे कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित होत होता. यावर्षी बंद रोहित्रांचा मुद्दा गल्लीपासून तर दिल्लीपर्यंंत गाजला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून तर आ. हरीश पिंपळे यांच्यापर्यंंत अनेकांनी या मुद्यावर महावितरणला धारेवर धरले. त्यामुळे महावितरणने नादुरुस्त रोहित्रावरील कृषिपंप ग्राहकांनी ७0 टक्के रकमेचा भरणा केला तर रोहित्र प्राधान्याने बदलून देण्याचा निर्णय घेतला. अमरावती परिमंडळातील ७0 टक्के रकमेचा भरणा केलेली ३६0 म्हणजे सर्वच रोहित्रे सद्यस्थितीत बदलण्यात आली आहेत. उर्वरित रोहित्रांवरील काही कृषिपंपधारकांनी ७0 टक्के पेक्षा कमी रकमेचा भरणा केला आहे, अशी २१७ रोहित्रेसुद्धा बदलविण्याचे काम प्रगतीपथावर असून, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे.