शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा रोहित्र बदलण्याचा धडाका

By admin | Updated: December 8, 2014 01:08 IST

अमरावती विभागातील ३६0 रोहित्र बदलली.

अकोला : गत एक वर्षापासून रोहित्र जळण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी शेतकरी पाण्याची सोय असल्यावरही सिंचन करू शकत नाहीत. आधीच दुष्काळ, त्यात भारनियमनाच्या संकटाने त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांच्या या मुद्याची राजकीय पुढार्‍यांनी गंभीर दखल घेत महावितरणला त्वरित रोहित्र बदलवून देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे महावितरणने त्वरित पावले उचलीत रोहित्र बदलण्याचा धडाका लावला असून, अमरावती विभागातील ३६0 रोहित्रे बदलली आहेत. उर्वरित रोहित्र दोन ते तीन दिवसांत बदलण्यात येणार आहे. सध्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू असल्यामुळे पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे कृषिपंपांचा वापर वाढला आहे. मंजुरीच्या क्षमतेनुसार कृषिपंप सुरू असल्यास रोहित्रे जळण्याची शक्यता फार कमी असते; परंतु मंजूर भारापेक्षा जास्त क्षमतेची मोटर लावल्यास रोहित्रावर ताण येतो व रोहित्र जळते. जळालेले रोहित्र महिनोमहिने बदलण्यात येत नव्हते. त्यामुळे कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित होत होता. यावर्षी बंद रोहित्रांचा मुद्दा गल्लीपासून तर दिल्लीपर्यंंत गाजला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून तर आ. हरीश पिंपळे यांच्यापर्यंंत अनेकांनी या मुद्यावर महावितरणला धारेवर धरले. त्यामुळे महावितरणने नादुरुस्त रोहित्रावरील कृषिपंप ग्राहकांनी ७0 टक्के रकमेचा भरणा केला तर रोहित्र प्राधान्याने बदलून देण्याचा निर्णय घेतला. अमरावती परिमंडळातील ७0 टक्के रकमेचा भरणा केलेली ३६0 म्हणजे सर्वच रोहित्रे सद्यस्थितीत बदलण्यात आली आहेत. उर्वरित रोहित्रांवरील काही कृषिपंपधारकांनी ७0 टक्के पेक्षा कमी रकमेचा भरणा केला आहे, अशी २१७ रोहित्रेसुद्धा बदलविण्याचे काम प्रगतीपथावर असून, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे.