शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

महाविकास आघाडीचा निर्णय मुंबईत, आज बैठक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:13 IST

अकाेला : अकाेला व वाशिम जिल्हा परिषदेच्या पाेटनिवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडीत सहभागी घटक पक्ष एकत्रितरीत्या निवडणूक लढविण्यासाठी रणनीती आखत ...

अकाेला : अकाेला व वाशिम जिल्हा परिषदेच्या पाेटनिवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडीत सहभागी घटक पक्ष एकत्रितरीत्या निवडणूक लढविण्यासाठी रणनीती आखत आहेत. साेमवारी अकाेल्यात घटक पक्षांची बैठक झाली असून, आघाडीतील जागावाटपाबाबत बुधवारी मुंबईत बैठक हाेत आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांच्या बंगल्यावर हाेत असलेल्या या बैठकीसाठी आघाडीच्या नेत्यांना आमंत्रित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अकाेला व वाशिम जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी १४ जागांसाठी १९ जुलै राेजी निवडणूक हाेत आहे. यासाठी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून, राजकीय समीकरणांची मांडणी वेगाने हाेत आहे. अकाेल्यात महाविकास आघाडीचे गठण करून वंचित बहुजन आघाडीची सत्ता खाली खेचण्यासाठी मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच अनुषंगाने साेमवारी आघाडीतील नेत्यांची बैठक झाली; मात्र कुठलाही निर्णय हाेऊ शकला नाही. या बैठकीतील चर्चेची माहिती पक्षाच्या वरिष्ठांना नेत्यांनी दिली असून, त्याच अनुषंगाने डाॅ. शिंगणे यांच्या बंगल्यावर मंगळवारी बैठक हाेत आहे.

महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रितरीत्या निवडणूक लढवावी ही आमची भूमिका असून, त्याच अनुषंगाने बैठक बाेलविली आहे. या बैठकीसाठी घटक पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे.

- डाॅ. राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री

आघाडीत सहभागी हाेण्याबाबत साेमवारी झालेल्या बैठकीत आमचे प्रतिनिधी सहभागी झाले हाेते; मात्र डाॅ. शिंगणे यांच्याकडील बैठकीबाबत मला कल्पना नाही. आघाडीत सन्मानजनक जागा मिळाल्या तर उत्तमच; अन्यथा प्रहार स्वतंत्र लढेल.

- बच्चू कडू, पालकमंत्री अकाेला

महाविकास आघाडीबाबत उपनेते अरविंद सावंत यांच्यासाेबत चर्चा केली असून, त्यांच्या सूचनेनुसार डाॅ. शिंगणे यांच्याकडील बैठकीला उपस्थित राहणार आहे.

- आ. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना

...तर सेना व प्रहारला साेबत घेऊ

महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येत जागावाटपाबाबत समाधानी झाले तर आनंदच आहे; मात्र काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह कायम असेल तर राष्ट्रवादी, शिवसेना व प्रहार असे तीन पक्ष एकत्रित येऊन जिल्हा परिषदेची निवडणूक लढवू, अशी प्रतिक्रिया आमदार अमाेल मिटकरी यांनी दिली.

काँग्रेसच्या स्वबळाचा आग्रह आघाडीसाठी अडसर

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ हे कमी झाले आहे. त्यामुळे त्यांना अधिक जागा देण्याबाबत आघाडीतील इतर पक्ष सहमत नसल्याची माहिती आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिलेला स्वबळाचा नारा स्थानिक पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीत सहभागी हाेण्याबाबत अडसर ठरत आहे. त्यामुळे बुधवारी हाेणाऱ्या बैठकीत काँग्रेस सहभागी हाेणार का? यावरच महाविकास आघाडीच्या एकसंघतेचे भविष्य अवलंबून आहे.