शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

कृषी केंद्र संचालकांच्या पवित्र्याने महाबीजला  धसका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:35 IST

गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात शेतकर्‍यांना  अनुदानित दराने वाटपासाठी असलेल्या हरभरा  विक्रीसाठी उत्पादक महाबीजने माहितीच न दिल्याने  त्याची खुल्या बाजारातील दराने विक्री केल्याचा  खुलासा काही केंद्र संचालकांनी केला. ‘लोकम त’मध्ये त्याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध होताच  महाबीजच्या संबंधितांनी जिल्हा परिषदेच्या कृषी  विभागात धाव घेत कारवाईबाबतची माहिती घेतली.  त्यामुळे आधी काहीच झाले नसल्याचा डांगोरा  िपटणार्‍या महाबीज यंत्रणेला तोंडावर पडण्याची वेळ  जवळ आल्याची चिन्हे आहेत. 

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला मागितली  कारवाईची माहितीमहाबीजने केली होती थातूरमातूर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात शेतकर्‍यांना  अनुदानित दराने वाटपासाठी असलेल्या हरभरा  विक्रीसाठी उत्पादक महाबीजने माहितीच न दिल्याने  त्याची खुल्या बाजारातील दराने विक्री केल्याचा  खुलासा काही केंद्र संचालकांनी केला. ‘लोकम त’मध्ये त्याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध होताच  महाबीजच्या संबंधितांनी जिल्हा परिषदेच्या कृषी  विभागात धाव घेत कारवाईबाबतची माहिती घेतली.  त्यामुळे आधी काहीच झाले नसल्याचा डांगोरा  िपटणार्‍या महाबीज यंत्रणेला तोंडावर पडण्याची वेळ  जवळ आल्याची चिन्हे आहेत. हरभरा घोटाळ्यात काहीच निष्पन्न न झाल्याचा  पवित्रा, आधी महाबीजनेही घेतला होता. जिल्हा  परिषदेच्या कृषी विभागानेही कारवाईस टाळाटाळ  करीत फाइल बंद करण्याची तयारी केली होती.  त्याचवेळी विभागीय कृषी सहसंचालकांच्या पथकांनी  घोटाळ्यातील काळाबाजार उघड केला. त्यातून  अकोला शहरातील चार बड्या वितरकांसह  जिल्हय़ातील २११ कृषी केंद्र संचालक कारवाईच्या  रडारवर आले आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी  विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी जवळपास  १४६ केंद्र संचालकांना नोटीस बजावल्या. त्यांचे  खुलासे प्राप्त होत आहेत. त्यामध्ये अनेकांनी हरभरा  बियाण्याचा घोटाळा होण्यास महाबीज जबाबदार  असल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे आता या प्रकरणा त महाबीजने मुद्दामपणे केलेल्या हलगर्जीपणाचे पि तळ उघडे पडणार आहे. 

महाबीजने केली होती थातूरमातूर कारवाईहजारो क्विंटल अनुदानित हरभरा बियाण्यातून  कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटणारे वितरक, कृषी  सेवा केंद्र संचालकांची त्याचवेळी इमानेइतबारे  झाडाझडती घेतली असती, तर त्याचवेळी या  घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असता; मात्र ती तत्परता  न दाखविता दिखाव्यासाठी थातूरमातूर कारवाई करीत  चार वितरकांचे परवाने काही महिन्यांसाठी निलंबित  करण्यात आले. जूनच्या सुरुवातीला खरीप हंगाम  सुरू होताच, त्यांना वितरकाचा दर्जा कायम करण्यात  आला. त्यामुळे महाबीजची चौकशी, कारवाई आणि  हेतूबद्दलही शंका निर्माण होत आहेत. -