शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

महाबीजच्या आमसभेत हलकल्लोळ!

By admin | Updated: December 29, 2014 23:54 IST

भागधारक शेतक-यांची भोजनाची अपुरी व्यवस्था, खुच्र्यांची फेकाफेक.

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) आमसभेत भागधारक शेतकर्‍यांची भोजनाची अपुरी व्यवस्था झाल्याने एकच हलकल्लोळ उडाला. दूरवरू न आलेल्या भागधारकांना भोजन मिळाले नसल्याने आणि लाभांशाच्या मुद्दय़ावर संतप्त शेतकर्‍यांनी खुच्र्यांची फेकाफेक करू न नाराजी व्यक्त केली तसेच लोकप्रतिनिधी, महाबीज प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. महाबीजची ३७ वी आमसभा अकोला येथील मुख्यालयी २९ डिसेंबर रोजी घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल होते. व्यासपीठावर आमदार रणधीर सावरकर, महाबीजचे संचालक खासदार संजय धोत्रे, वल्लभराव देशमुख, महाबीजचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश्‍वर राजूरकर, महाबीजचे महाव्यवस्थापक (प्रक्रिया) डॉ. विनोद काळबांडे आदींची उपस्थिती होती. या सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तोपर्यंत सर्व शांत होते. भोजन अवकाशात मात्र भागधारक शेतकर्‍यांची भोजनाची पुरेपूर सोय न झाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी महाबीज प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत खुच्र्यांची फेकाफेक केली. यानंतर पुन्हा सभेला सुरुवात झाली तेव्हा संतप्त भागधारकांनी लाभांशाच्या मुद्दय़ावर प्रशासन व संचालक मंडळाला धारेवर धरले. प्रमोद गावंडे यांनी तर आमदार रणधीर सावरकर यांना व्यासपीठावरू न खाली उतरवण्यासाठी प्रचंड नारेबाजी केली. त्यामुळे महाबीज मुख्यालयात गोंधळ निर्माण झाला. सभेसाठी टाकण्यात आलेला शामियानाची ओढाताणही करण्यात आली. याबाबत आ. सावरकर यांची प्रतिक्रिया घेतली असता, ते म्हणाले की महाबीजचा भागधारक, बिजोत्पादक, शिवाय आमदार असल्याने मला व्यासपीठावर पाचारण करण्यात आले होते. तथापि एका शेतकर्‍याने याबाबत हरकत घेतली. लोकशाहीत सर्वांनाच बोलण्याचा अधिकार असल्याने मी व्यासपिठाच्या खाली उतरलो. पण, लगेच पुन्हा मला व्यासपिठावर बोलावण्यात आल्याचे आ. रणधीर सावरकर यांनी सांगीतले.