शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी ‘माफसू’चे शेतकरी जनजागृती अभियान!

By admin | Updated: August 18, 2015 01:33 IST

विदर्भ-मराठवाड्यातील एक हजार गावांत शास्त्रज्ञ करणार प्रबोधन.

अकोला : शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने (माफसू) विदर्भ -मराठवाड्यातील एक हजार गावांत शेतकरी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेतीला पुरक दुग्ध, कुक्कुट व पशुसंवर्धनाचा व्यवसाय करण्यासाठी माफ सूचे शास्त्रज्ञ शेतकर्‍यांचे प्रबोधन करणार आहेत. ग्रामीण भागात पूर्वी प्रत्येक शेतकर्‍याकडे पशुधन असायचे, किमान दोन गायी, म्हैस असायचीच; पण अलीकडे नगदी पिकांकडे (कॅश क्रॉप) शेतकरी वळल्याने गावागावांतील पशुधन कमी झाले आहे. या नगदी पिकांमुळे शेतातील चार्‍याचे उत्पादनच घटले आहे. परिणामी शेतकर्‍यांनी पशुधन कमी केले आहे; पण बदलत्या परिस्थितीत आता शेतीला पुरक उद्योगांची गरज निर्माण झाली असून, शेतकर्‍यांना आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिकेपासून परावृत्त करण्यासाठी ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय व इतर कृषीवर आधारित पुरक व्यवसाय सुरू करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने माफूसच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने विदर्भ-मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यासाठी शेतकरी जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिकेपासून शेतकर्‍यांना परावृत्त करण्याची गरज आहे. त्यासाठी विदर्भ- मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी शेतकरी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा खर्च स्वत: पशू शास्त्रज्ञ करणार असल्याचे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. एन.एन. झाडे यांनी सांगीतले.