शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो कामांवर दहा जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी मजूर

By admin | Updated: October 9, 2015 01:59 IST

दहा जिल्ह्यांमधील कामांवर मजुरांची संख्या सर्वाधिक

संतोष येलकर/अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात राज्यातील ३४ जिल्ह्यातील कामे आणि कामांवरील मजुरांची उपस्थिती बघता, चालू आठवड्यात दहा जिल्ह्यांमध्ये रोहयो कामांवर सर्वाधिक मजूर उपस्थिती असून, दहा जिल्ह्यांमधील कामांवर मजुरांची उपस्थिती सर्वात कमी असल्याचे आढळून आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत एकूण १३ हजार ३१७ कामे सुरू असून, या कामांवर १ लाख २ हजार ७२९ मजूर काम करीत आहेत. ३ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड, अमरावती, उस्मानाबाद, नागपूर, लातूर, परभणी, जळगाव, सांगली, नांदेड व अहमदनगर या दहा जिल्ह्यांमध्ये ३ ऑक्टोबर अखेरपर्यंत रोहयो कामांवर सर्वात जास्त मजूर उपस्थिती आहेत. कोल्हापूर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पालघर, अकोला, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, सोलापूर व औरंगाबाद या दहा जिल्ह्यांमध्ये रोहयो कामांवर सरासरी सर्वात कमी मजुरांची उपस्थिती असल्याची बाब नियोजन व रोहयो विभागाच्या साप्ताहिक अहवालात समोर आली आहे. रोहयो कामांवर सर्वात कमी मजूर उपस्थितीचे जिल्हे जिल्हा मजूर उपस्थिती कोल्हापूर १0६ रायगड १३७ ठाणे ३१४ रत्नागिरी ७३७ पालघर ७५३ अकोला ७७९ सिंधुदुर्ग ८३५ चंद्रपूर १0१७ सोलापूर १११५ औरंगाबाद ११५१ रोहयो कामांवर सर्वात जास्त उपस्थितीचे जिल्हे जिल्हा मजूर उपस्थिती बीड १७0२३ अमरावती ९८९९ उस्मानाबाद ९३९२ नागपूर ५६४९ लातूर ५५८२ परभणी ५२२७ जळगाव ५१0६ सांगली ३७९२ नांदेड ३७0१ अहमदनगर ३२५३ एक हजारावर मजूर उपस्थितीत घट! ३ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत रोहयो अंतर्गत राज्यातील रोहयो कामांवर १ हजार २१६ मजुरांची घट झाली आहे. त्यामध्ये सर्वात जास्त घट धुळे जिल्ह्यात ४ हजार १९५, सांगली जिल्ह्यात १ हजार ५९0, वर्धा जिल्ह्यात १ हजार ४६0, जालना जिल्ह्यात ८३४ व गडचिरोली जिल्ह्यात ७१0 मजूर उपस्थितीत घट झाल्याचा समावेश आहे.