शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कमावता व्यक्ती गमावला; जिल्ह्यातील गरीब कुटुंबांना मदतीचा आधार; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

By संतोष येलकर | Updated: December 22, 2023 18:43 IST

वारसांच्या खात्यात जमा होणार

अकाेला : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबास २० हजार रुपयांची सानुग्रह मदत दिली जाते. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत कुटुंबातील कमावता व्यक्ती गमावलेल्या जिल्ह्यातील कुटुंबांना सानुग्रह मदत वितरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी गुरुवारी दिला. त्यामुळे कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ३१६ कुटुंबांतील वारसांच्या खात्यात लवकरच सानुग्रह मदतीची रक्कम जमा करण्यात येणार असून, संबंधित कुटुंबांना मदतीचा आधार मिळणार आहे.

शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबांतील कमावत्या आणि कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वर्षभरात संबंधित कुटुंबास वीस हजार रुपयांची सानुग्रह मदत दिली जाते. त्यानुसार गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या कुटुंबातील वारसांकडून संबंधित तहसील कार्यालयांकडे सानुग्रह मदतीसाठी अर्ज करण्यात आले. जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडे प्राप्त झालेल्या अर्जानुसार गरीब कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ३१६ कुटुंबांना सानुग्रह मदत वितरित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी कुंभार यांनी २१ डिसेंबर रोजी दिला. मदतीची ही रक्कम तहसील कार्यालयामार्फत कमावती व्यक्ती गमावलेल्या संबंधित कुटुंबातील वारसांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

मदत मंजूर केलेल्याकुटुंबांची अशी आहे संख्या !तालुका संख्याअकोला शहर ६०अकोला ग्रामीण ५०बार्शिटाकळी १४अकोट ५५तेल्हारा ४२बाळापूर २५पातूर ३०मूर्तिजापूर ४०राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ३१६ कुटुंबांना सानुग्रह मदत वितरित करण्याचा आदेश दिला आहे. सानुग्रह मदतीची रक्कम जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमार्फत संबंधित कुटुंबातील वारसांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.अजित कुंभार,जिल्हाधिकारी, अकोला

टॅग्स :Akolaअकोला