शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात रोगामुळे तीन एकरातील कपाशी पिकाचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:25 IST

शिरपूर येथील रहिवासी शेख आसीम व नासेहा अंजुम यांची चांगेफळ शिवारात सामूहिक क्षेत्र सर्व्ह नंबर ४८/ १, एक हेक्टर ...

शिरपूर येथील रहिवासी शेख आसीम व नासेहा अंजुम यांची चांगेफळ शिवारात सामूहिक क्षेत्र सर्व्ह नंबर ४८/ १, एक हेक्टर ६२ आर असे तीन एकर शेतीमध्ये बँक व सावकाराकडून व्याजाने कर्ज काढून कपाशी पिकांची पेरणी केली होती. परंतु गेल्या आठवडाभरापूर्वी अज्ञात रोगामुळे तीन एकरातील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. तीन एकरातील कपाशी पेरणीसाठी आतापर्यंत जवळपास ७० ते ८० हजार रुपये खर्च लावण्यात आला. मात्र या कपाशी पिकावर लावण्यात आलेला खर्च पाण्यात गेला आहे. याबाबत शेतकरी शेख आसीम यांनी वारंवार कृषी विभागाशी संपर्क केला. मात्र, अद्यापही प्रतिसाद मिळाला नाही, अखेर आठवडाभरानंतर कृषी विभागाच्या संबंधितांनी आठवडाभरानंतर शेतात भेट दिली, पंचनामा करून शेतकऱ्याची स्वाक्षरी घेऊन पंचनामा कृषी विभागाच्या वरिष्ठाकडे सादर करणे अपेक्षित होते. परंतु, थातूरमातूर पाहणी करून, फोटो काढून निघून गेल्याचा आरोप शेतकरी शेख आसीम यांनी केला आहे. सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

कृषी विभागाच्या दिरंगाईमुळे शेतकरी हतबल

शेतकरी शेख आसीम यांच्या शेतातील अज्ञात रोगामुळे तीन एकरातील कपाशीचे नुकसान झाले, वारंवार संपर्क केल्यानंतर अखेर आठवडाभरानंतर कृषी विभागाने धडक दिली, कपाशीचा पंचनामा करणे अपेक्षित असताना थातूरमातूर पाहणी करून फक्त फोटो काढण्यात आले. त्यामुळे कृषी विभागाच्या दिरंगाईमुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

फोटो:

त्या कपाशी पिकाची पाहणी करण्यात आली असून, कपाशी पिकावर तणनाशक फवारणी केली आहे. तसेच पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल.

-धनंजय शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर

गेल्या आठ दिवसांपासून तीन एकरातील कपाशी पिकावर रोग आल्यामुळे नुकसान झाले आहे. याबाबत कृषी विभागाशी वारंवार संपर्क केला. परंतु, आठ दिवसांनंतर पंचनामा करणे अपेक्षित असताना थातूरमातूर पाहणी करून फोटो काढण्यात आले.

-शेख आसीम, शेतकरी चांगेफळ