शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

शेती झाली तोट्याची; हमीभावही लागवडी खर्चापेक्षा कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST

रवी दामोदर अकोला: निसर्गचक्र बदलल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. अशातच यंदा कोरोनाचे संकट, पेट्रोल, डिझेलची दरवाढ, वाढलेली महागाई ...

रवी दामोदर

अकोला: निसर्गचक्र बदलल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. अशातच यंदा कोरोनाचे संकट, पेट्रोल, डिझेलची दरवाढ, वाढलेली महागाई यामुळे लागवडीचा खर्च हा हजारोंनी वाढला, तर त्या तुलनेत हमीभाव मात्र केवळ ७० रुपयांनी वाढल्याने शेती तोट्याची झाली आहे. प्रति एकर लागवडीचा खर्च हा हमीभावापेक्षा जास्त असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२१-२२ या वर्षासाठी हमीभाव जाहीर केले; केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार प्रति क्विंटल २० ते ४५२ रुपयांची वाढ झाली. त्यामध्ये जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या हमीभावात ७० रुपये, कपाशीमध्ये २०० ते २१० रुपये इतकी वाढ झाली आहे. दुसरीकडे वाढलेल्या महागाईमुळे लागवडी खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १००० ते १५०० रुपयांनी वाढ झाली आहे. निसर्गाचे चक्र बदलल्याने गतवर्षी अति पावसामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन व कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा बियाणांचे दर वाढले आहेत. सोयाबीनच्या बियाणांच्या एका बॅगची किंमत चार हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. सरासरी विचार केल्यास एकरी एक बॅग बियाणे लागते. तसेच रासायनिक खतांचे वाढलेले भाव, गावरान खताच्या दरात वाढ झाली आहे. एवढा खर्च, परिश्रम घेऊनही निसर्गाचा समतोल बिघडल्याने पीक हाती येईल की नाही, याची शाश्वती नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

पीक यंदाचा हमीभाव झालेली वाढ

मूग ७२७५ ७९

उडीद ६३०० ३००

सोयाबीन ३९५० ७०

कपाशी (मध्यम धागा) ५७२६ २११

कपाशी (लांबधागा) ६०२५ २००

तूर ६३०० ३००

ज्वारी (हायब्रीड) २७३८ ११८

--------------------------------

गतवर्षीच्या तुलनेत १० हजार रुपयांनी वाढला खर्च

गेल्या वर्षी कापूस, तूर आणि सोयाबीनचा पेरा हा जिल्ह्यात सर्वाधिक होता. या पिकासाठी शेतकऱ्याला प्रति एकर जवळपास ३० हजार रुपये येतो; मात्र यंदा ट्रॅक्टरद्वारे शेती महागली, बियाणांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे यंदा खरीप हंगामात जवळपास १० हजार रुपयांनी वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

-------------------------------

यंदा डिझेलचे दर वाढले, मजुरी महागली यामुळे लागवडी खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. तसेच वेळेवर पाऊस येत नसल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. शेती न परवडणारी झाली असून, सरकारने हमीभावात वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

हेमंत नागे, शेतकरी, पाचपिंपळ.