शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेती झाली तोट्याची; हमीभावही लागवडी खर्चापेक्षा कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST

रवी दामोदर अकोला: निसर्गचक्र बदलल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. अशातच यंदा कोरोनाचे संकट, पेट्रोल, डिझेलची दरवाढ, वाढलेली महागाई ...

रवी दामोदर

अकोला: निसर्गचक्र बदलल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. अशातच यंदा कोरोनाचे संकट, पेट्रोल, डिझेलची दरवाढ, वाढलेली महागाई यामुळे लागवडीचा खर्च हा हजारोंनी वाढला, तर त्या तुलनेत हमीभाव मात्र केवळ ७० रुपयांनी वाढल्याने शेती तोट्याची झाली आहे. प्रति एकर लागवडीचा खर्च हा हमीभावापेक्षा जास्त असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२१-२२ या वर्षासाठी हमीभाव जाहीर केले; केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार प्रति क्विंटल २० ते ४५२ रुपयांची वाढ झाली. त्यामध्ये जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या हमीभावात ७० रुपये, कपाशीमध्ये २०० ते २१० रुपये इतकी वाढ झाली आहे. दुसरीकडे वाढलेल्या महागाईमुळे लागवडी खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १००० ते १५०० रुपयांनी वाढ झाली आहे. निसर्गाचे चक्र बदलल्याने गतवर्षी अति पावसामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन व कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा बियाणांचे दर वाढले आहेत. सोयाबीनच्या बियाणांच्या एका बॅगची किंमत चार हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. सरासरी विचार केल्यास एकरी एक बॅग बियाणे लागते. तसेच रासायनिक खतांचे वाढलेले भाव, गावरान खताच्या दरात वाढ झाली आहे. एवढा खर्च, परिश्रम घेऊनही निसर्गाचा समतोल बिघडल्याने पीक हाती येईल की नाही, याची शाश्वती नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

पीक यंदाचा हमीभाव झालेली वाढ

मूग ७२७५ ७९

उडीद ६३०० ३००

सोयाबीन ३९५० ७०

कपाशी (मध्यम धागा) ५७२६ २११

कपाशी (लांबधागा) ६०२५ २००

तूर ६३०० ३००

ज्वारी (हायब्रीड) २७३८ ११८

--------------------------------

गतवर्षीच्या तुलनेत १० हजार रुपयांनी वाढला खर्च

गेल्या वर्षी कापूस, तूर आणि सोयाबीनचा पेरा हा जिल्ह्यात सर्वाधिक होता. या पिकासाठी शेतकऱ्याला प्रति एकर जवळपास ३० हजार रुपये येतो; मात्र यंदा ट्रॅक्टरद्वारे शेती महागली, बियाणांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे यंदा खरीप हंगामात जवळपास १० हजार रुपयांनी वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

-------------------------------

यंदा डिझेलचे दर वाढले, मजुरी महागली यामुळे लागवडी खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. तसेच वेळेवर पाऊस येत नसल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. शेती न परवडणारी झाली असून, सरकारने हमीभावात वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

हेमंत नागे, शेतकरी, पाचपिंपळ.