शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने शेतक-यांचे नुकसान

By admin | Updated: February 11, 2017 02:41 IST

शेतक-यांना मोबदला द्या; आमदार सिरस्कार यांची मागणी.

बाळापूर (अकोला), दि. १0- राष्ट्रीय महामार्ग क्र. सहाच्या चौपदरीकरणासाठी बाळापूर तालुक्यातील ४५ हेक्टर ८६ आर जमीन संपादित केली. मात्र चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने शेतकर्‍यांना संपादीत शेतीचा पूर्ण मोबदला व शेती उत्पन्नापासून मुकावे लागल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्याचा आरोप आमदार बळीराम सिरस्कार यांनी १0 फेब्रुवारी रोजी पारस येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.राष्ट्रीय महामार्ग क्र. सहामध्ये बाळापूर तालुक्यात रिधोरा ते जिल्हा हद्द (तरोडा शिवार) पर्यंत ३0 कि. मी.च्या रस्त्याचा अंतर्भाव आहे. या महामार्गाच्या दुतर्फा ४५ हेक्टर ८६ शेतजमीन संपादित करण्यात आली. त्यासाठी प्रशासनाच्यावतीने ३४ हेक्टरचा पहिला अवॉर्ड व ११ हेक्टरचा दुसरा अवॉर्ड करून शेतीचा अल्प मोबदला देण्यात आला.४५ हेक्टर ८६ आर जमीन ४३४ शेतकर्‍यांची असून, त्यांना दोन वर्षांपासून शेतीचा उर्वरित मोबदलाही मिळाला नाही, तसेच त्यांचे शेतीचे उत्पन्न डुबल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मागील दोन वर्षांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. महामार्गाच्या दुतर्फा मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले, त्यामुळे पर्यावरणाचा मोठा र्‍हास होत आहे. शासनाने तातडीने चौपदरीकरण पूर्ण करावे, अन्यथा संपादित जमिनींची वहिती शेतकर्‍यांना करू द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. बाळापूर मतदारसंघात सिंचन क्षेत्रवाढीसाठी आवश्यक नैसर्गिक क्षेत्र उपलब्ध आहे. मनारखेड, बाळापूर येथे पारस वीज निर्मिती प्रकल्पाची दोन धरणे आहेत. नेरधामणा, कवठा बॅरेज, नया अंदुरा येथील प्रकल्पांची ८0 टक्के कामे पूर्णत्वास झाली आहेत; परंतु तापी महामंडळाचा अहवाल शासनाला पोहोचला नसल्याने उर्वरित काम निधीअभावी रखडले आहे. २0 टक्के काम पूर्ण करण्याची हमी संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनी देण्यास तयार आहे. कन्स्ट्रक्शन कंपनीने काम बंद केल्याने मजुरांच्या हातांना काम नाही. जलयुक्त शिवार योजना पाण्याची पातळी वाढण्यासाठी चांगली असली, तरी काही शेतकरी बांधव या योजनेची कामे करण्यास तयार नाहीत. भविष्यात भूगर्भातील पाण्याची पातळी आटल्यास भावी पिढीला पाण्यापासून मुकावे लागण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून भूगर्भात पाणी पातळी वाढविण्यासाठी सहकार्य करून सदर योजना पूर्णत्वास नेण्याचे आवाहन आमदार सिरस्कार यांनी केले.बाळापूर येथील प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडून अर्थसंकल्प अधिवेशनात आवश्यक इमारत निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करून घेऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले. पत्रकार परिषदेला भारिप बमसंचे संतोष सुरोसे, श्याम खोपडे आदी उपस्थित होते. वीज निर्मितीचा वाढीव प्रकल्प सुरू करा!पारस औष्णिक केंद्रांतर्गत वाढीव प्रकल्पासाठी ५00 हेक्टर शेतजमिनी ताब्यात घेतल्या. १000 मेगावॅट वीज निर्मितीसाठी आवश्यक असणार्‍या पाण्यासाठी दोन मोठी धरणे बांधली आहेत. एवढे पाणी व जमीन पुरेशी असल्याने पारस येथे ५00 वीज मेगावॅट वीज निर्मितीचा वाढीव प्रकल्प सुरू करावा, अन्यथा शेतकर्‍यांची शेती त्यांना परत द्यावी व दोन्ही धरणातून परिसरातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी देण्यात यावे, अशी मागणी आमदार बळीराम सिरस्कार यांनी केली आहे.