शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

वीज वितरण हानीत लक्षणीय घट

By admin | Updated: October 18, 2014 23:41 IST

प्रभावी उपाययोजनांमुळे गळती ३५ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर!

काही तासांची प्रतीक्षा : कुणाच्या गळ्यात पडणार आमदारकीची माळवर्धा : मतदान झाल्यानंतर कोण निवडून येणार याची भाकिते वर्तविली जाऊ लागली. मतांची गणिते जुळविली गेली. मतदार राजाचा कौल प्रत्येकाकडून आपापल्यापरीने वर्तविण्याचा खटाटोप गत काही दिवसांपासून सुरू आहे. मतदारांनी नेमका कौल कुणाला दिला? सारी भाकिते खोटी ठरतील काय, हे आता काही तासांनीच कळणार आहे. याची उत्सुकता आता खऱ्या अर्थाने शिगेला पोहचली आहे.रविवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होत आहे. वर्धा व देवळी मतदार संघाची मतमोजणी वर्धेत तर आर्वी व हिंगणघाट मतदार संघाची त्या-त्या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वर्धा विधानसभा मतदार संघात एकूण २१ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश देशमुख, भाजपाचे डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, शिवसेनेचे रविकांत बालपांडे, बसपाचे नीरज गुजर ही दिग्गज मंडळी आपले राजकीय भवितव्य आजमावत होते. यासोबत बहुजन मुक्ती पार्टीचे किशोर किणकर, शेकाप स्कर्मिश खडसे यांच्यासह अन्य राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. खरी लढत प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गजांमध्येच लढतीचे एकंदर चित्र आहे. मात्र कुणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडते, हे रविवारीच कळणार आहे. वर्धेत बहुरंगी लढतीचे चित्र असल्यामुळे उत्सुकता शिगेला पाहोचली आहे.देवळी मतदार संघात १९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहेत. यामध्ये काँग्रेसचे विद्यमान माजी मंत्री रणजित कांबळे, भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे, या दोन दिग्गजांमध्येच ही लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शशांक घोडमारे, बसपाचे उमेश म्हैसकर, शिवसेनेचे नीलेश गुल्हाने ही मंडळीदेखील रिंगणात होती. मतदार राजा रणजित कांबळे यांना चौथ्यांदा विधानसभेवर पाठविते वा माजी खासदार सुरेश वाघमारे यांना पहिल्यांदा पाठविते. याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.हिंगणघाट मतदार संघात १४ उमेदवार आपली राजकीय शक्ती पणाला लावून होते. यामध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार अशोक शिंदे, राष्ट्रवादी कडून माजी आमदार राजू तिमांडे, भाजपाकडून समीर कुणावार, काँग्रेसकडून उषाकिरण थुटे, बसपाचे प्रलय तेलंग, मनसेचे अतुल वांदिले ही दिग्गज मंडळी रिंगणात होती. यापैकी कोण नवा आमदार होईल, याची जनतेला उत्सुकता आहे.आर्वी मतदार संघात काँग्रेसकडून माजी आमदार अमर काळे आणि भाजपकडून विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्यात कडवी झुंज बघायला मिळाली. या झुंजीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप काळे, प्रहारचे बाळा जगताप आणि शिवसेनेचे निलेश देशमुख यांनी चुरस निर्माण केल्यामुळे मतदार राजा कुणाचे गणित बिघडवेल याची उत्सुकता लागली आहे. अमर काळे यांना संधी द्यायची वा दादाराव केचे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवायचा हे मतमोजणी नंतरच कळणार आहे. चारही मतदार संघात मतदारराजाचा कौल कुणाला याचे रहस्य उलगडणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)