शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वीज वितरण हानीत लक्षणीय घट

By admin | Updated: October 18, 2014 23:41 IST

प्रभावी उपाययोजनांमुळे गळती ३५ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर!

काही तासांची प्रतीक्षा : कुणाच्या गळ्यात पडणार आमदारकीची माळवर्धा : मतदान झाल्यानंतर कोण निवडून येणार याची भाकिते वर्तविली जाऊ लागली. मतांची गणिते जुळविली गेली. मतदार राजाचा कौल प्रत्येकाकडून आपापल्यापरीने वर्तविण्याचा खटाटोप गत काही दिवसांपासून सुरू आहे. मतदारांनी नेमका कौल कुणाला दिला? सारी भाकिते खोटी ठरतील काय, हे आता काही तासांनीच कळणार आहे. याची उत्सुकता आता खऱ्या अर्थाने शिगेला पोहचली आहे.रविवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होत आहे. वर्धा व देवळी मतदार संघाची मतमोजणी वर्धेत तर आर्वी व हिंगणघाट मतदार संघाची त्या-त्या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वर्धा विधानसभा मतदार संघात एकूण २१ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश देशमुख, भाजपाचे डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, शिवसेनेचे रविकांत बालपांडे, बसपाचे नीरज गुजर ही दिग्गज मंडळी आपले राजकीय भवितव्य आजमावत होते. यासोबत बहुजन मुक्ती पार्टीचे किशोर किणकर, शेकाप स्कर्मिश खडसे यांच्यासह अन्य राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. खरी लढत प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गजांमध्येच लढतीचे एकंदर चित्र आहे. मात्र कुणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडते, हे रविवारीच कळणार आहे. वर्धेत बहुरंगी लढतीचे चित्र असल्यामुळे उत्सुकता शिगेला पाहोचली आहे.देवळी मतदार संघात १९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहेत. यामध्ये काँग्रेसचे विद्यमान माजी मंत्री रणजित कांबळे, भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे, या दोन दिग्गजांमध्येच ही लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शशांक घोडमारे, बसपाचे उमेश म्हैसकर, शिवसेनेचे नीलेश गुल्हाने ही मंडळीदेखील रिंगणात होती. मतदार राजा रणजित कांबळे यांना चौथ्यांदा विधानसभेवर पाठविते वा माजी खासदार सुरेश वाघमारे यांना पहिल्यांदा पाठविते. याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.हिंगणघाट मतदार संघात १४ उमेदवार आपली राजकीय शक्ती पणाला लावून होते. यामध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार अशोक शिंदे, राष्ट्रवादी कडून माजी आमदार राजू तिमांडे, भाजपाकडून समीर कुणावार, काँग्रेसकडून उषाकिरण थुटे, बसपाचे प्रलय तेलंग, मनसेचे अतुल वांदिले ही दिग्गज मंडळी रिंगणात होती. यापैकी कोण नवा आमदार होईल, याची जनतेला उत्सुकता आहे.आर्वी मतदार संघात काँग्रेसकडून माजी आमदार अमर काळे आणि भाजपकडून विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्यात कडवी झुंज बघायला मिळाली. या झुंजीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप काळे, प्रहारचे बाळा जगताप आणि शिवसेनेचे निलेश देशमुख यांनी चुरस निर्माण केल्यामुळे मतदार राजा कुणाचे गणित बिघडवेल याची उत्सुकता लागली आहे. अमर काळे यांना संधी द्यायची वा दादाराव केचे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवायचा हे मतमोजणी नंतरच कळणार आहे. चारही मतदार संघात मतदारराजाचा कौल कुणाला याचे रहस्य उलगडणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)