शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

कामगारांना लॉकडाऊनची; उद्योजकांना कामगार गावी जाण्याची धास्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:17 IST

गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यावर त्यातील बहुतांश कामगार मिळेल त्या मार्गाने घरी परतले होते. अनेक कामगारांना पायी घर गाठावे ...

गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यावर त्यातील बहुतांश कामगार मिळेल त्या मार्गाने घरी परतले होते. अनेक कामगारांना पायी घर गाठावे लागले; मात्र गावाकडे रोजगाराची मोठी संधी नाही, असे लक्षात आल्यावर डिसेंबर अखेर अकोल्यात पुन्हा दाखल झाले. कामगारांना परत आणण्यासाठी ठेकेदार, कंपनी मालकांनी यंत्रणा राबवली होती. आता परत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आधीपेक्षा रुग्णवाढीचा वेग अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक निर्बंध लावले आहेत. शहरातील हॉटेल व्यवसाय, बांधकाम क्षेत्र अडचणीत आले आहे. मागील वर्षीचे नुकसान भरून न निघाल्याने औद्योगिक वसाहतीतील सर्वच व्यवसाय ५०-६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. अशात पुन्हा मोठ्या लॉकडाऊनची शक्यता आहे, तसे झाल्यास ठेकेदार, मालक पुन्हा आपल्याला वाऱ्यावर सोडतील, अशी भीती कामगारांना वाटू लागली आहे. त्यामुळे कामगार गावाकडे परत जात आहेत.

--बॉक्स--

गेल्या वर्षीची आठवण...

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये येथे अडकून पडल्याने कामगारांचे प्रचंड हाल झाले. अनेकांना एकवेळच्या जेवणावर दिवस काढावे लागले.

मुला-बाळांसह पायी गावाकडे जाण्याची वेळ हजारो कामगारांवर आली होती. वेळेवर वाहन उपलब्ध होऊ न शकल्याने मोठा त्रास सहन करावा लागला.

काम बंद आणि खिशात पैसे नसल्याने कामगारांवर मोठे संकट कोसळले होते. कामगारांना मिळेल त्या वाहनाने गावाकडे परतावे लागले होते.

--बॉक्स--

कामगार कुठे किती?

८,०००

औद्योगिक वसाहत

१,५००

हॉटेल व्यवसाय

२५,०००

बांधकाम क्षेत्र

--बॉक्स--

हाताला काम नाही, इथे तरी काय करणार?

--कोट--

कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय संकटात आला आहे. त्यामुळे कामही कमी झाले आहे. पुढे लॉकडाऊन लागल्यास संपूर्ण काम बंद होईल. मग इथे तरी काय करणार, असा प्रश्न आहे.

रितेश बंसल, कामगार.

--कोट--

काही दिवसांपासून कमी प्रमाणात सुरू असलेला बांधकाम व्यवसाय शासनाच्या निर्बंधामुळे ठप्प आहे. आणखी किती दिवस हाताला काम राहील, सांगता येत नाही. त्यामुळे आता घराकडे गेलेले बरे.

विनेश गवळी, कामगार.

--कोट--

औद्योगिक वसाहतीतील उद्योग सद्यस्थितीत सुरू आहे; मात्र ते कमी प्रमाणात आहे. लॉकडाऊनची धास्ती असल्याने काम राहील की नाही, माहिती नाही. त्यामुळे अनेक सहकारी गावाला परतत आहेत.

राजेंद्र यादव, कामगार.

--बॉक्स--

कामगार गावी परतला तर...

--कोट--

लॉकडाऊन लागल्यास औद्योगिक क्षेत्रातील उद्योग सुरू राहणार आहेत. या उद्योगांमध्ये परराज्यातील कामगार कमी आहेत. कामगारांची तेवढी काळजी घेणार असून, कामगार गेल्यास काही उद्योगांना अडचण निर्माण होईल.

उन्मेश मालू, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन.

--कोट--

कोरोनामुळे आधीच हॉटेल व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये राजस्थान व पश्चिम बंगाल येथील कामगार जाण्याच्या तयारीत आहेत. हे कामगार गेल्यास हॉटेल व्यवसायाचे न भरून निघणारे नुकसान होईल.

योगेश अग्रवाल, अध्यक्ष, हॉटेल ॲण्ड कॅटरींग असोसिएशन.

--कोट--

शहरातील मोठ्या बांधकामांमध्ये परप्रांतीय कामगार आहेत. लॉकडाऊनमुळे हे कामगार परत गेल्यास या बांधकामांवर मोठा परिणाम होईल. शहरात असे जवळपास २५ टक्के बांधकाम सुरू आहेत.

दिनेश ढगे, अध्यक्ष, क्रेडाई.