शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

भुसावळ मंडळात धावणार लोकल!

By admin | Updated: September 30, 2015 23:44 IST

मध्य रेल्वे प्रशासनासमोर प्रस्ताव; लोकलसाठी भुसावळ-नाशिकदरम्यान केली जातेय चाचणी.

राम देशपांडे/ अकोला : मुंबईच्या धर्तीवर भुसावळ मंडळातदेखील लोकल ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी भुसावळ ते नाशिक (नांदगाव) दरम्यान काही चाचण्या घेतल्या जात असून, भुसावळ मंडळाच्या अधिकार्‍यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मध्य रेल्वे मार्गावर भुसावळ मार्गे धावणार्‍या सर्वच एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांना पूर्वीच्या तुलनेत गर्दी वाढली आहे; मात्र प्रवाशांना पुरेशा सुविधा नसल्याने रेल्वेच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ झाली नाही. या आणि इतर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, मुंबई उपनगरीय रेल्वेप्रमाणे लोकल ट्रेन चालविण्याचा प्रस्ताव गत काही वर्षांपासून मध्य रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन होता. त्याला रेल्वे प्रशासनाने हिरवी झेंडी दाखवविली असून, या प्रस्तावानुसार भुसावळ ते नाशिक, भुसावळ ते अकोला आणि भुसावळ ते इटारसी या तीन प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यंत क्षणात वेग धरणार्‍या लोकल धावतील. मुंबईच्या धर्तीवर भुसावळ मंडळातही अनेक पायाभूत सुविधांचा अभाव असून, त्यांच्या पूर्ततेकरिता आवश्यक निधी व उपाययोजनांकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. हे काम अधिक वेगाने व्हावे, याकरिता भुसावळ ते नांदगाव-नाशिकदरम्यान अनेक चाचण्या घेण्यात येत असल्याची माहिती भुसावळ मंडळाच्या सुत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी भुसावळ ते नागपूरदरम्यान विशेष मार्ग तयार करण्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केली होती. वर्धा ते नागपूरदरम्यान हा मार्ग पूर्ण झाला असला तर, उर्वरित मार्गाचे काम अद्याप थंड बस्त्यात आहे. त्यामुळे आहे त्याच मध्य रेल्वे मार्गावर लोकल चालविता येतील की नाही, लोकलची गती किती ठेवावी लागेल, त्याकरिता लागणारी सिग्नल व्यवस्था, थांबे, तसेच इतर एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होता कामा नये, यासाठी स्थानकांवर या एक्स्प्रेस गाड्यांचा थांबण्याचा सुनियोजित कालावधी आदी बाबींवर मध्य रेल्वेची विशेष चमू अभ्यास करीत आहे. या अभ्यासातून येणारे निष्कर्ष आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यासंदर्भात सध्या कोणताही कार्यक्रम हाती नसला तरी, भुसावळ मंडळातील रेल्वे प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याचा आनंद लवकरच उपभोगता येणार असल्याचे संकेत सध्याच्या हालचालींवरून मिळत आहेत. भुसावळ मंडळात लोकल सुरू करण्यासाठी नांदगाव- नाशिकदरम्यान विविध चाचण्या घेण्यात येत असून, या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर लोकल चालविण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अकोला-इटारसी आणि भुसावळ-अकोलादरम्यान लोकल चालविण्यात येईल. यासाठी लागणार्‍या आवश्यक मनुष्यबळाची भरती करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले असल्याचे भुसावळ येथील वरिष्ठ मंडळ अधिकारी विजय नायर यांनी सांगीतले.