शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलने संस्काराची दालने व्हावीत

By admin | Updated: December 13, 2014 00:07 IST

हरिभाऊ वेरूळकर यांचे प्रतिपादन :अकोला येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाला थाटात प्रारंभ.

अकोला : आज सुसंस्कारांची कमतरता सर्वच क्षेत्रात जाणवत आहे. ज्या शिक्षण क्षेत्रातून संस्काराची अपेक्षा केली जाते, त्यानेदेखील संस्काराची नाळ तोडली आहे. अशा परिस्थितीत साहित्य संमेलनांमधून संस्काराचा विचार प्रतिपादीत होणे गरजेचे आहे; कारण साहित्य संमेलन हा एक लोकोत्सव आहे, यातून विचारांचे सिंचन होते. संस्काराची जबाबदारी आता साहित्यिकांनी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. सर्वच साहित्य संमेलने ही संस्काराची दालने झाली पाहिजेत, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनी शुक्रवारी अकोल्यात व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने आयोजित दुसर्‍या राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आचार्य वेरुळकर बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन अमरावती येथील प्राचार्य डॉ. पी.आर. राजपूत यांच्या हस्ते झाले. मंचावर शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. गजानन नारे, महापौर उज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, गुरुदेव सेवा मंडळाचे उप सर्वाधिकारी रुपराव वाघ, ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मण नारखेडे, भाई प्रदीप देशमुख, डॉ. पुरुषोत्तम तायडे, अँड. रामसिंग राजपूत, आमले महाराज, डॉ. ज्ञानेश्‍वर मिरगे, सुधाताई जवंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रसंताचे विचार म्हणजे सर्व संतांचे विचार, त्यामुळे हे संमेलन सर्व संतांच्या विचारांचे संमेलन असल्याचे वेरुळकर यांनी यावेळी सांगितले. आजची समाज व्यवस्था सुधारावी, असे वाटत असेल, तर राष्ट्रसंतांच्या विचारांशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले. साहित्य संमेलन चौकटबद्ध करु नका. सर्वांना यात सामावून घ्या; कारण राष्ट्रसंतांना सर्वसमावेशक विचार प्रिय होते, असे डॉ. राजपूत यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले. यावेळी रुपराव वाघ, प्रा. संजय खडसे, महापौर उज्वला देशमुख व उपमहापौर विनोद मापारी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. गजानन नारे यांनी केले. संचालन रामेश्‍वर बरगट यांनी, तर आभार प्रा. अभिजीत गहूकर यांनी मानले. दुपारच्या सत्रात दोन परिसंवाद व राष्ट्रसंतांच्या भजनांचे सादरीकरण झाले. रविवारी या तीन दिवसीय संमेलनाचा समारोप होणार आहे.