शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘हे जीवन एक लढाई, कधी हिंमत हारायची नाही!’

By admin | Updated: February 17, 2016 02:33 IST

ग्रंथोत्सवातील कविसंमेलनात उमटली शेतक-यांची व्यथा.

अकोला: शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवात मंगळवारी दुपारी ३ वाजता कविसंमेलन पार पडले. वैदर्भीय शेतकर्‍यांचे दु:ख म्हणजे एक लढाई असून, ती जिंकण्यासाठी हिंमत न हारण्याचे आवाहन करणारी कविता किशोर बळी यांनी सादर करून वैदर्भीय शेतकर्‍यांची सद्यस्थिती मांडली. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुरेश पाचकवडे होते. व्यासपीठावर उपस्थित अरविंद भोंडे, राजेश दांगटे, सुरेश पाचकवडे, रवींद्र महल्ले व पोहेकर यांनी आपल्या विविध रचना सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांना भारावून सोडले. यावेळी राजेश दांगटे यांनी ह्यशांताबाईह्ण व ह्यपुस्तकांचे झाडह्ण या दोन काव्यरचना सादर केल्या, तर ग्रंथालयाचे कर्मचारी पोहेकर यांनी ह्यग्रंथालयात तुम्ही बसून पाहा, पुस्तकाच्या सान्निध्यात जगून पाहा.ह्ण व ह्यहुंडाह्ण या ज्वलंत विषयावर कविता सादर केल्या. अरविंद भोंडे यांनी अनेक विनोदी किस्से सांगून उपस्थितांना खळाळून हसविले तसेच ह्यराम-रहीम एक आहे, सारे जण म्हणतात..ह्ण ही देशभक्तीचा संदेश देणारी रचना सादर केली. रवींद्र म्हल्ले यांनी ग्रामीण भागातील सत्यस्थितीचे वर्णन करणारी वर्‍हाडी कविता सादर करून रसिकांना हेलावून सोडले. सुरेश पाचकवडे यांनी ह्यदहशतह्ण आणि ह्यदगडह्ण या दोन काव्यरचना सादर केल्या. बहारदार सूत्रसंचालन करताना बळी यांनी ह्यकसं सांगू तुले सावित्रीबाई फुले..ह्ण ही कविता सादर करून, विसंगती, अतिशयोक्ती व अपेक्षाभंगातून कसे विनोदी किस्से घडतात, हे सांगत अनेक किश्श्यांद्वारे रसिक श्रोत्यांना खळखळून हसविले. कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.