शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

‘हे जीवन एक लढाई, कधी हिंमत हारायची नाही!’

By admin | Updated: February 17, 2016 02:33 IST

ग्रंथोत्सवातील कविसंमेलनात उमटली शेतक-यांची व्यथा.

अकोला: शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवात मंगळवारी दुपारी ३ वाजता कविसंमेलन पार पडले. वैदर्भीय शेतकर्‍यांचे दु:ख म्हणजे एक लढाई असून, ती जिंकण्यासाठी हिंमत न हारण्याचे आवाहन करणारी कविता किशोर बळी यांनी सादर करून वैदर्भीय शेतकर्‍यांची सद्यस्थिती मांडली. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुरेश पाचकवडे होते. व्यासपीठावर उपस्थित अरविंद भोंडे, राजेश दांगटे, सुरेश पाचकवडे, रवींद्र महल्ले व पोहेकर यांनी आपल्या विविध रचना सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांना भारावून सोडले. यावेळी राजेश दांगटे यांनी ह्यशांताबाईह्ण व ह्यपुस्तकांचे झाडह्ण या दोन काव्यरचना सादर केल्या, तर ग्रंथालयाचे कर्मचारी पोहेकर यांनी ह्यग्रंथालयात तुम्ही बसून पाहा, पुस्तकाच्या सान्निध्यात जगून पाहा.ह्ण व ह्यहुंडाह्ण या ज्वलंत विषयावर कविता सादर केल्या. अरविंद भोंडे यांनी अनेक विनोदी किस्से सांगून उपस्थितांना खळाळून हसविले तसेच ह्यराम-रहीम एक आहे, सारे जण म्हणतात..ह्ण ही देशभक्तीचा संदेश देणारी रचना सादर केली. रवींद्र म्हल्ले यांनी ग्रामीण भागातील सत्यस्थितीचे वर्णन करणारी वर्‍हाडी कविता सादर करून रसिकांना हेलावून सोडले. सुरेश पाचकवडे यांनी ह्यदहशतह्ण आणि ह्यदगडह्ण या दोन काव्यरचना सादर केल्या. बहारदार सूत्रसंचालन करताना बळी यांनी ह्यकसं सांगू तुले सावित्रीबाई फुले..ह्ण ही कविता सादर करून, विसंगती, अतिशयोक्ती व अपेक्षाभंगातून कसे विनोदी किस्से घडतात, हे सांगत अनेक किश्श्यांद्वारे रसिक श्रोत्यांना खळखळून हसविले. कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.