शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आयटीआय प्रशिक्षणार्थींना जीवन गट विम्याचे कवच!

By admin | Updated: June 29, 2017 01:32 IST

गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांचा पाठपुरावा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योजना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व शासकीय तांत्रिक विद्यालयांमधील प्रवेशीत प्रशिक्षणार्थींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यंदा शैक्षणिक वर्षापासून जीवन गट विमा योजना शासनाने लागू केली आहे. यासाठी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून ही योजना लागू करून घेतली. औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेताना अनेकदा जोखमीचे व धोकादायक यंत्र हाताळावे लागतात. हे यंत्र हाताळताना अनेकदा अपघात घडून विद्यार्थ्यांवर मृत्यूचासुद्धा प्रसंग ओढावतो. त्यामुळे आयटीआय व तांत्रिक विद्यालयात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जीवन गट विम्याच्या माध्यमातून सुरक्षा कवच लाभावे, यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेऊन ही योजना अमलात यावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. बुधवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी कौशल्य विकास विभागाच्या विविध घटकांचा आढावा घेतला. या बैठकीला कौशल्य विकास विभागाचे संचालक व मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.बैठकीत डॉ. पाटील यांनी महाजन समिती अहवाल तसेच गेडाम समिती अहवालांची सद्यस्थिती, समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली कार्यवाही आणि विलंबाची कारणे, सेंटर आॅफ एक्सलन्स (सीओई) अंतर्गत अ‍ॅडव्हान्स मॉड्युलरचे सीटीएसमध्ये रूपांतर करण्याबाबत आणि या योजनेतील मंजूर पदांचे समायोजन याबाबत सद्यस्थिती, तासिका तत्त्वावरील निदेशकांचे मानधन वाढविणे, गट-अ ते गट-क पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरणे याचीही माहिती डॉ. रणजित पाटील यांनी जाणून घेतली. द्विस्तरीय अभ्यासक्रम बदलण्याची गरज!द्विस्तरीय अभ्यासक्रम प्रक्रिया संपूर्ण बदलण्याची गरज असून, राज्यातील कमी मागणीचे अभ्यासक्रम असलेल्या ५३२ तुकड्या या जास्त मागणीच्या अभ्यासक्रमासाठी वर्ग करणे, यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही डॉ. पाटील यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.