शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; एक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:26 IST

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाण्यांना प्रचंड मागणी वाढली आहे. पण टंचाई असल्याचे भासवत कृषी सेवा केंद्राकडून वाढीव दराने ...

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाण्यांना प्रचंड मागणी वाढली आहे. पण टंचाई असल्याचे भासवत कृषी सेवा केंद्राकडून वाढीव दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच निविष्ठा विक्री करताना लिंकिंग करणे, सोयाबीन बियाणे विकताना शेतकऱ्यांच्या पावतीवर शिक्का मारण्याचे प्रकरण अशा विविध विषयांमध्ये कृषी सेवा केंद्राच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी भरारी पथके स्थापन करून जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले आहे. यामध्ये कृषी सेवा केंद्रांना नोटीस काढल्या होत्या. संबंधित कृषी सेवा केंद्रांची सुनावणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी येथील कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर तेल्हारा येथील एका कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला. यामध्ये पाच कृषी सेवा केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे. यात तेल्हारा तालुक्यांतील केंद्रांचा समावेश आहे.

सेवा केंद्र चालकांनी कायद्याचे उल्लंघन करू नये. कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करावा, अन्यथा अशी कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, याची काळजी घ्यावी.

- डॉ. कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

आतापर्यंत झालेली कारवाई

जिल्ह्यामध्ये कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत चार कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर आठ केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे.