शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; एक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:26 IST

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाण्यांना प्रचंड मागणी वाढली आहे. पण टंचाई असल्याचे भासवत कृषी सेवा केंद्राकडून वाढीव दराने ...

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाण्यांना प्रचंड मागणी वाढली आहे. पण टंचाई असल्याचे भासवत कृषी सेवा केंद्राकडून वाढीव दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच निविष्ठा विक्री करताना लिंकिंग करणे, सोयाबीन बियाणे विकताना शेतकऱ्यांच्या पावतीवर शिक्का मारण्याचे प्रकरण अशा विविध विषयांमध्ये कृषी सेवा केंद्राच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी भरारी पथके स्थापन करून जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले आहे. यामध्ये कृषी सेवा केंद्रांना नोटीस काढल्या होत्या. संबंधित कृषी सेवा केंद्रांची सुनावणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी येथील कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर तेल्हारा येथील एका कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला. यामध्ये पाच कृषी सेवा केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे. यात तेल्हारा तालुक्यांतील केंद्रांचा समावेश आहे.

सेवा केंद्र चालकांनी कायद्याचे उल्लंघन करू नये. कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करावा, अन्यथा अशी कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, याची काळजी घ्यावी.

- डॉ. कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

आतापर्यंत झालेली कारवाई

जिल्ह्यामध्ये कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत चार कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर आठ केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे.