शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

शेतमालाला हमीभाव मिळावा!

By admin | Updated: October 1, 2015 00:06 IST

लोकमत परिचर्चेत सूर; सिंचन, पुरेसा वीजपुरवठा व पीक कर्ज वेळेवर मिळण्याची अपेक्षा.

बुलडाणा : मागील चार वर्षांंंपासून दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी उत्पादनात घट येणार असल्यामुळे आर्थिक फटका बसणार आहे. त्यातच शेतमालास निर्यातबंदी असून, तूर, कांदा आदी पिकांची आयात करण्यात येत आहे. त्याचा फटका देशातील शेतकर्‍यांना बसत आहे. शासनाने शेतमालाची निर्यातबंदी उठवावी व उत्पादित मालाला हमी भाव द्यावा, तरच निसर्गामुळे कोलमडलेला शेतकरी हिंमतीने उभा राहू शकतो, असा सूर लोकमतने ३0 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या परिचर्चेत सहभागी शेतकर्‍यांनी काढला. जिल्ह्यात मागील चार वर्षापासून विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी जेरीस आले आहेत. प्रतिकूल हवामान, पावसाच्या अनियमिततेमुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खरीप हंगाम दगा देऊन गेला. यामुळे आर्थिक तथा मानसिकदृष्ट्या खचलेल्या काही शेतकर्‍यांनी आत्महत्येसारखा दुर्दैवी निर्णय घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान, काही सेवाभावी संस्थांनी विविध माध्यमातून शेतकर्‍यांना मदत केली; मात्र शेतकर्‍यांना जगवायचे असेल, तर शासनाने ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. अन्नधान्य पिकविणारा शेतकरी जगला, तरच देश जगेल, हा मूलमंत्र लक्षात घेऊन शासनाने उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी यावेळी व्यक्त केली. या परिचर्चेत समाधान पाटील,विष्णू पाटील कुळसुंदर, सुरेश पाटील, डॉ. बाबूराव नरोटे, देविदास कणखर इत्यादी मान्यवरांनी सहभाग नोंदवला.