शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

सर्वपक्षीय दिग्गजांची अकोल्याकडे पाठ

By admin | Updated: October 14, 2014 01:41 IST

मोठय़ा नेत्यांच्या सभाच नाहीत, स्थानिकांच्या खांद्यावरच प्रचाराचा भर.

अकोला : सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असून, दिग्गज नेत्यांच्या सभा व दौरे संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येत आहेत. अकोल्याकडे मात्र एकही दिग्गज नेता फिरकला नसून, जिल्हा वाळीत टाकल्यासारखी गत झाली आहे. नेत्यांनी वार्‍यावर सोडल्यामुळे सैरभैर झालेल्या उमेदवारांनी प्रचाराची धुरा स्वत:च्याच खांद्यावर घेतली आहे. अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा आहेत. यापैकी दोन जागा भाजप, दोन भारिप तर एका जागेवर शिवसेनेचा आमदार आहे. या विधानसभा निवडणुकीत सेना- भाजप व काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात सर्वच पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरविले. आता प्रचाराचा धुराळा उडेल व राष्ट्र, राज्य पातळीवरील नेते जिल्ह्यात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणुकीत जिल्ह्याकडे सर्वच मोठय़ा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सपशेल पाठ फिरविली. निवडणूक प्रचारात सर्वात मोठे आकर्षण आहे ते पंतप्रधान नरेंद मोदी यांचे. मोदी यांनी अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सभा घेतल्या, मात्र अकोल्यात आले नाहीत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी वाशिम येथे सभा घेतली. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी बुलडाणा येथे सभा घेतली. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अमरावतीत सभा घेतली; मात्र त्यांच्या सभा अकोला जिल्ह्यात झाल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही सभा झाली नाही. बाळापूर येथे शिवसंग्रामचा उमेदवार असतानाही, विनायक मेटेंनी एकही सभा घेतली नाही. त्यामुळे नेत्यांनी उमेदवारांना वार्‍यावर सोडल्यासारखी गत झाली. जिल्ह्यात शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे वगळता एकाही मोठय़ा नेत्याची सभा झाली नाही. बाळापूर, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातही एकाही मोठय़ा नेत्याची सभा झाली नाही.