शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

अकोला जिल्हय़ात कायदा व सुव्यवस्था ढासळली

By admin | Updated: July 3, 2014 01:40 IST

खंडणीबहाद्दर, चोरटे, लुटारु, गावगुंडांचे वाढते प्रस्थ

अकोला: जिल्हय़ासह शहरामध्ये गल्लीबोळातील गुंडांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दररोज घरफोड्या, चोर्‍या, हाणामारी, लुटमारीच्या घटना घडत आहेत. पोलिस केवळ गुन्हा दाखल करण्यापुरतेच उरले आहेत. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे गुंड, चोरट्यांचे मनोबल वाढले. दररोजच्या घडणार्‍या गंभीर गुन्हय़ांमुळे जिल्हय़ात कायदा व सुव्यवस्था केवळ नावालाच असल्याचा आरोप आता नागरिकांकडून होऊ लागला आहे. जिल्हय़ातील बाळापूर तालुक्यातील काही गावांमध्ये चोरट्यांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. गावातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. पोलिसांचे काम नागरिकांना करावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली. चोरी, घरफोडी झाली की, पोलिस घटनास्थळावर पोहोचून पंचनामा करतात. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करतात. गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरणाचा तपास सहा महिनेच काय वर्षभरानंतरही सुरू असतो. तक्रारकर्ता पोलिस ठाण्याच्या चकरा मारून थकून जातो; परंतु त्याला न्याय मिळत नाही. त्याचा चोरीस गेलेला माल परत नाही. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्‍वास कमी होत आहे. चोरी, घरफोडी, फसवणूक झाली, खंडणी मागितली तरी पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला जात नाही. एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही वर्षांपासून मुली, महिलांना पळवून नेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गुंडगिरीचे प्रमाण एवढे प्रचंड वाढले आहे की, गुंडगिरीला आवर कसा घालावा, याचे आव्हान पोलिसांसमोर उभे झाले आहे. खून, दरोडा, लुटमार, अपहरण, बलात्कार, छेडखानीसारख्या गंभीर गुन्हय़ांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून गुंडांकडून व्यावसायिक, बिल्डर, नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी गुन्हा कोणताही घडो, सर्वप्रथम नागरिकांनी पोलिसात तक्रार देण्याचे अवाहन केले. पोलिसांना माहिती द्यावी. तक्रार दिल्यानंतर पोलिस कारवाई करून गुंडांना अटक करतात. चोरी, घरफोडीचे गुन्हे सातत्याने उघडकीस येत आहेत. नागरिकांनी पोलिसांना दोष देण्याऐवजी त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे गुन्हेगारी वाढत आहे, कायदा व सुव्यवस्था ढासळली हे म्हणणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी नोंदविले.