शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अकोला जिल्हय़ात कायदा व सुव्यवस्था ढासळली

By admin | Updated: July 3, 2014 01:40 IST

खंडणीबहाद्दर, चोरटे, लुटारु, गावगुंडांचे वाढते प्रस्थ

अकोला: जिल्हय़ासह शहरामध्ये गल्लीबोळातील गुंडांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दररोज घरफोड्या, चोर्‍या, हाणामारी, लुटमारीच्या घटना घडत आहेत. पोलिस केवळ गुन्हा दाखल करण्यापुरतेच उरले आहेत. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे गुंड, चोरट्यांचे मनोबल वाढले. दररोजच्या घडणार्‍या गंभीर गुन्हय़ांमुळे जिल्हय़ात कायदा व सुव्यवस्था केवळ नावालाच असल्याचा आरोप आता नागरिकांकडून होऊ लागला आहे. जिल्हय़ातील बाळापूर तालुक्यातील काही गावांमध्ये चोरट्यांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. गावातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. पोलिसांचे काम नागरिकांना करावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली. चोरी, घरफोडी झाली की, पोलिस घटनास्थळावर पोहोचून पंचनामा करतात. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करतात. गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरणाचा तपास सहा महिनेच काय वर्षभरानंतरही सुरू असतो. तक्रारकर्ता पोलिस ठाण्याच्या चकरा मारून थकून जातो; परंतु त्याला न्याय मिळत नाही. त्याचा चोरीस गेलेला माल परत नाही. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्‍वास कमी होत आहे. चोरी, घरफोडी, फसवणूक झाली, खंडणी मागितली तरी पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला जात नाही. एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही वर्षांपासून मुली, महिलांना पळवून नेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गुंडगिरीचे प्रमाण एवढे प्रचंड वाढले आहे की, गुंडगिरीला आवर कसा घालावा, याचे आव्हान पोलिसांसमोर उभे झाले आहे. खून, दरोडा, लुटमार, अपहरण, बलात्कार, छेडखानीसारख्या गंभीर गुन्हय़ांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून गुंडांकडून व्यावसायिक, बिल्डर, नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी गुन्हा कोणताही घडो, सर्वप्रथम नागरिकांनी पोलिसात तक्रार देण्याचे अवाहन केले. पोलिसांना माहिती द्यावी. तक्रार दिल्यानंतर पोलिस कारवाई करून गुंडांना अटक करतात. चोरी, घरफोडीचे गुन्हे सातत्याने उघडकीस येत आहेत. नागरिकांनी पोलिसांना दोष देण्याऐवजी त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे गुन्हेगारी वाढत आहे, कायदा व सुव्यवस्था ढासळली हे म्हणणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी नोंदविले.