शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शेतक-यांपर्र्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचावे

By admin | Updated: December 5, 2014 01:29 IST

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी परिसंवादात तज्ज्ञांचे मत

अकोला: सततच्या नापिकीमुळे शेतकरी खचला असतानाच विदर्भातील महिला शेतकर्‍यांमधील अंगभूत निर्णयक्षमतेमध्ये विदर्भातील शेतीला तारून नेण्याची क्षमता आहे; मात्र त्या क्षमतेचा पूर्ण उपयोग होणे गरजेचे आहे. आज शेती तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत असताना शेतकर्‍यांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचू शकले नाही. त्यामुळे समाजाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यांपर्यंत नवीन विज्ञानाचा दुवा पोहोचला पाहिजे, असा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी संवाद -२0१४ अंतर्गत ह्यअप्रचलित शेती आणि तंत्रज्ञानह्ण या विषयावरील परिसंवादात उमटला. जगातील बहुतांश भागातील शेती आज प्रगत होत असून, अन्नधान्याच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. असे असतानादेखील प्रत्येक तोंडापर्यंत पुरेसे अन्न पोहोचले नसल्याचे वास्तव इंग्लंड येथील कृषितज्ज्ञ जीम विगन यांनी परिसंवादात मांडले. त्यांनी उत्पादनवाढीबरोबरच बाजारात सुरू असलेल्या नफेखोरीवर अंकु श आणण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी नैतिक मूल्यांचा ऊहापोह करून प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वत:पासून करण्यावर भर दिला. सुसंवाद, सेवा आणि एकात्मतेचा संदेश त्यांनी दिला. अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डेव्हिड विनडॉर्फ यांनी माती परीक्षणाच्या आधुनिक पद्धतीवर प्रकाश टाकला. अद्ययावत पद्धतीनुसार मातीचे प्रत्यक्ष नमुने न घेता केवळ लेझर किरणांद्वारे माती परीक्षणातून मातीची गुणवत्ता, त्यातील जीप्सम, सल्फर व अन्य घटकांचे प्रमाण लक्षात येत असल्याचे नमूद केले. या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग घेण्यासाठी टेक्सास विद्यापीठाशी करार करण्यावर विचार करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी यावेळी स्पष्ट केले. इस्त्रायल येथील संत्राउत्पादक तज्ज्ञ डोह रॅबेर यांनी संत्र्याची जास्त घनता लागवड पद्धतीवर प्रकाश टाकून शेतकर्‍यांच्या शंकांचे निरसन के ले. सर रतन टाटा ट्रस्टचे अमितांशु चौधरी यांनी ट्रस्टद्वारे चालविण्यात येत असलेल्या कृषी उपक्रमांवर प्रकाश टाकला. कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक पी. जी. इंगोले यांनी कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून महिला सबळीकरण प्रकल्पावर प्रक ाश टाकला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी आशिया पॅल्ट्यू या संस्थेचे संचालक डॉ. रवींद्र राव होते. मंचावर प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव देशमुख, डॉ. एस. के. अहेरकर आणि अमेरिकेतील कृषितज्ज्ञ सारा ह्यूमन उपस्थित होते. *शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाचा लाभ होतो का? तंत्रज्ञान शेतीपूरक असले तरी ते व्यापारी तत्त्वाला धरून असते. पण त्याच्या वापरातून शेतकर्‍याला लाभ मिळणार असेल, तरच तंत्रज्ञानाचा प्रसार होऊ शकतो अन्यथा नाही, अशी कोपरखळी प्रगतिशील शेतकरी ललित बहाळे यांनी परिसंवादादरम्यान मारली. तज्ज्ञांशी प्रश्नोत्तराच्या तासांत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.*शेती केवळ पोट भरण्याचा धंदा झालाशेती पैसा कमाविण्याचा धंदा नाही, तो केवळ पोट भरण्याचा धंदा म्हणून शिल्लक राहिला असल्याची खंत यवतमाळ येथील सेंद्रिय शेती कसणारे शेतकरी कमलकिशोर धोरण यांनी व्यक्त केली. विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेती चळवळ अधिक व्यापक करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.