शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

शेतक-यांपर्र्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचावे

By admin | Updated: December 5, 2014 01:29 IST

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी परिसंवादात तज्ज्ञांचे मत

अकोला: सततच्या नापिकीमुळे शेतकरी खचला असतानाच विदर्भातील महिला शेतकर्‍यांमधील अंगभूत निर्णयक्षमतेमध्ये विदर्भातील शेतीला तारून नेण्याची क्षमता आहे; मात्र त्या क्षमतेचा पूर्ण उपयोग होणे गरजेचे आहे. आज शेती तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत असताना शेतकर्‍यांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचू शकले नाही. त्यामुळे समाजाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यांपर्यंत नवीन विज्ञानाचा दुवा पोहोचला पाहिजे, असा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी संवाद -२0१४ अंतर्गत ह्यअप्रचलित शेती आणि तंत्रज्ञानह्ण या विषयावरील परिसंवादात उमटला. जगातील बहुतांश भागातील शेती आज प्रगत होत असून, अन्नधान्याच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. असे असतानादेखील प्रत्येक तोंडापर्यंत पुरेसे अन्न पोहोचले नसल्याचे वास्तव इंग्लंड येथील कृषितज्ज्ञ जीम विगन यांनी परिसंवादात मांडले. त्यांनी उत्पादनवाढीबरोबरच बाजारात सुरू असलेल्या नफेखोरीवर अंकु श आणण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी नैतिक मूल्यांचा ऊहापोह करून प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वत:पासून करण्यावर भर दिला. सुसंवाद, सेवा आणि एकात्मतेचा संदेश त्यांनी दिला. अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डेव्हिड विनडॉर्फ यांनी माती परीक्षणाच्या आधुनिक पद्धतीवर प्रकाश टाकला. अद्ययावत पद्धतीनुसार मातीचे प्रत्यक्ष नमुने न घेता केवळ लेझर किरणांद्वारे माती परीक्षणातून मातीची गुणवत्ता, त्यातील जीप्सम, सल्फर व अन्य घटकांचे प्रमाण लक्षात येत असल्याचे नमूद केले. या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग घेण्यासाठी टेक्सास विद्यापीठाशी करार करण्यावर विचार करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी यावेळी स्पष्ट केले. इस्त्रायल येथील संत्राउत्पादक तज्ज्ञ डोह रॅबेर यांनी संत्र्याची जास्त घनता लागवड पद्धतीवर प्रकाश टाकून शेतकर्‍यांच्या शंकांचे निरसन के ले. सर रतन टाटा ट्रस्टचे अमितांशु चौधरी यांनी ट्रस्टद्वारे चालविण्यात येत असलेल्या कृषी उपक्रमांवर प्रकाश टाकला. कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक पी. जी. इंगोले यांनी कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून महिला सबळीकरण प्रकल्पावर प्रक ाश टाकला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी आशिया पॅल्ट्यू या संस्थेचे संचालक डॉ. रवींद्र राव होते. मंचावर प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव देशमुख, डॉ. एस. के. अहेरकर आणि अमेरिकेतील कृषितज्ज्ञ सारा ह्यूमन उपस्थित होते. *शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाचा लाभ होतो का? तंत्रज्ञान शेतीपूरक असले तरी ते व्यापारी तत्त्वाला धरून असते. पण त्याच्या वापरातून शेतकर्‍याला लाभ मिळणार असेल, तरच तंत्रज्ञानाचा प्रसार होऊ शकतो अन्यथा नाही, अशी कोपरखळी प्रगतिशील शेतकरी ललित बहाळे यांनी परिसंवादादरम्यान मारली. तज्ज्ञांशी प्रश्नोत्तराच्या तासांत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.*शेती केवळ पोट भरण्याचा धंदा झालाशेती पैसा कमाविण्याचा धंदा नाही, तो केवळ पोट भरण्याचा धंदा म्हणून शिल्लक राहिला असल्याची खंत यवतमाळ येथील सेंद्रिय शेती कसणारे शेतकरी कमलकिशोर धोरण यांनी व्यक्त केली. विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेती चळवळ अधिक व्यापक करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.