शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

गत दहा दिवसांत २६० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:30 IST

अनंत वानखडे बाळापूर : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, नागरिक गंभीर नसल्याचे चित्र आहे. तालुका हॉटस्पॉट बनत चालला ...

अनंत वानखडे

बाळापूर : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, नागरिक गंभीर नसल्याचे चित्र आहे. तालुका हॉटस्पॉट बनत चालला असून, गत दहा दिवसांत २६० जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गत दहा दिवसांत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात नागरिक विनामास्क फिरत असल्याचे चित्र असून, ठिकठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग हा वेगाने वाढत चालला आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना प्रशासनामार्फत कारवाई थंडावल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात २६० ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तालुक्यात कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. प्रशासनामार्फत कोविड प्रतिबंधक उपाययोजना करताना दिसत नसल्याने कोरोनाचा दैनंदिन आकडा वाढत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी एकदेखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास परिसर सील करणे व इतर उपाययोजना केल्या जात होत्या. मात्र, सद्य:स्थितीत तसे केले जात नाही. होम क्वारंटाइन असलेले रुग्ण दिवसभर शहरात वावरताना दिसून येत आहेत, तसेच शहरात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून, नागरिक विनामास्क मुक्त संचार करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. (फोटो)

----------------------------------------------

बाजारपेठेसह दुकानात नियमांचे उल्लंघन!

शहरातील बाजारपेठेत नागरिक विनामास्क वावरत आहेत, तसेच दुकानांमध्ये दुकानदारांसह ग्राहक विनामास्क दिसून येत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळेच तालुक्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काेरोनाला रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे, तसेच सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू आहे. यावेळेत नागरिक गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.