शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

'शकुंतलेला' अखेरची घरघर : मूर्तिजापूर-अचलपूर-यवतमाळ फेरी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 18:36 IST

काही काळातच शकुंतला पॅसेजर बंद होण्याच्या मार्गावर असल्याने त्याच बरोबर मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचा जंक्शन दर्जाही संपुष्टात येणार आहे.

- संजय उमक

मूर्तिजापूर: ब्रिटिश सरकारने सुरू केलेली ‘शकुंतला’ मूर्तिजापूर-अचलपूर, मूर्तिजापूर - यवतमाळ पॅसेंजर फेरी अनेक महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. यामुळे शकुंतला अखेरच्या घटका मोजत आहे. काही काळातच शकुंतला पॅसेजर बंद होण्याच्या मार्गावर असल्याने त्याच बरोबर मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचा जंक्शन दर्जाही संपुष्टात येणार आहे.मूर्तिजापूर-यवतमाळ व मूर्तिजापूर-अचलपूर अशा दोन शकुंतला पॅसेंजर या रेल्वे स्थानकावरून सकाळी ७.१५ वाजता धावतात; परंतु मूर्तिजापूर- यवतमाळ ही शकुंतला पॅसेंजर काही कारणास्तव अनेक महिन्यांपासून बंद आहे. दरम्यान, काही दिवसांपासून मूर्तिजापूर-अचलपूर ही गाडीसुद्धा बंद करण्यात आली. मूर्तिजापूर-अचलपूर, मूर्तिजापूर-यवतमाळ मार्गे धावणारी शकुंतला पॅसेंजर येत्या आठ-दिवसात रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. या संदर्भात शकुंतलेच्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मुंबईवरून रेल्वे अधिकाऱ्यांचे विशेष पथक मूर्तिजापूर येथे येऊन गेले आहे. शकुंतला रेल्वे प्रचंड तोट्यात असल्याने ती चालविणे आता रेल्वे प्रशासनाला जिकिरीचे झाले असल्याचे सांगून येत्या आठ-दहा दिवसात शकुंतला कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे येथे असलेला ‘जंक्शन’ दर्जाही जाणार आहे.ब्रिटिशकालीन असलेली शकुंतला १९०३ मध्ये भारतात क्लिक अ‍ॅण्ड निक्सन या ब्रिटिश कंपनी कंपनीने सुरू केलेल्या वाफेवर चालणारे इंजीन घेऊन अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ ही पहिली ७ डब्यांची छोटी पॅसेंजर गाडी १८९ किलोमीटरचे अंतर पार करायची. कालांतराने मूर्तिजापूर-अचलपूर, मूर्तिजापूर-यवतमाळ या ४ डब्यांच्या दोन गाड्या सुरू करण्यात आल्या. पूर्वी वाफेवर धावणारे इंजीन काढून १५ एप्रिल १९९४ तिला डीझल इंजीन जोडण्यात आले. फक्त एवढीच प्रगती या गाडीने केली. या गाडीचा क्लिक अ‍ॅण्ड निक्सन या ब्रिटिश कंपनीशी असलेला करार १९९५ मध्ये संपुष्टात आल्याने जणू ती गुलामगिरीतून मुक्तच झाली असली तरी लगान म्हणून भारत सरकारकडून १ कोटी २० लाख रुपये अजूनही द्यावे लागत असल्याने आजही ती गुलामगिरीतून मुक्त झाली का, असा प्रश्न निर्माण होतो.

या रेल्वे लाईनची निर्मिती ब्रिटीशांनी अचलपूर - यवतमाळ मोठी कापूस व्यापारपेठ असल्याने कापूस मालाची ने-आण करण्याच्या मुख्य उद्देश्याने केली होती. इंजिनची धावण्याची क्षमता कमी असल्याने ताशी २० ते २५ किलोमीटर धावते. ही गाडी प्रचंड तोट्यात असल्याने अनेक वेळा बंद करण्यात आली होती. सन २०१४ व २०१६ मध्ये ती सलग बंद करण्यात आली होती.स्थानिक जनतेच्या मागणी केल्याने ती पुन्हा सुरु करण्यात आली. सद्यस्थितीत मूर्तिजापूर- यवतमाळ, मूर्तिजापूर - अचलपूर धावणाºया या दोन्ही गाड्या बंद करण्यात आल्या आहेत.  या लोहमार्गाचे रुंदीकरण करुन शकुंतलेला नवीन स्वरूप देऊन तिच्यात नवचैतन्य निर्माण करावे अशी मागणी या प्रसंगी जोर धरू लागली आहे. 

लोकप्रतिनिधी उदासीनशकुंतलेची रेल्वे लाईन असल्याने मूर्तिजापूर स्टेशन जंक्शन म्हणून ओळखले जायचे. परंतु आता शकुंतला कायम बंद होणार असल्याने बंद होणार असल्याने या स्टेशनचा जंक्शन दर्जा जाणार आहे. जंक्शन स्टेशन असताना सुद्धा येथे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा नाही. लांब पल्ल््याच्या गाड्या येथे थांबवाव्यात म्हणून आतापर्यंत अनेक निवेदने देऊन आंदोलने सुध्दा करण्यात आली. परंतु निगरगट्ट शासन व सुस्तावलेले जनप्रतिनिधी असल्याने गाड्यांचे थांबे येथे होऊ शकले नाही.त्यातल्या त्यात आता शकुंतला सुध्दा बंद होणार आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी कमालीचे दुर्लक्ष करीत असल्यानेच असे प्रकार मूर्तिजापूरात घडत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधुन येत आहे. 'शकुंतला' नामकरणअमरावतीचे तत्कालीन खासदार कॉं. सुदामकाका देशमुख यांनी या गाडीतून प्रवास केला होता. प्रवासादरम्यान गाडी खूपच हळूहळू चालत असल्याने उपरोधाने या गाडीला 'शकुंतला' संबोधन दिल्याने तेव्हा पासून या गाडीचे 'शकुंतला' असे नामकरण झाल्याचे बोलल्या जाते. शकुंतला रेल्वे बंद झाल्याने जंक्शन दर्जा जाणार आहे.परंतु मूर्तिजापूर स्टेशन 'बी' दर्जाचे असल्याने हा दर्जा कायम राहणार असून इतर गाड्यांच्या थांब्यावर काहीही फरक पडणार नाही. स्टेशनचा दर्जा केवळ सिग्नल व्यवस्थेवर अवलंबून असतो.टी. आर. सवई, स्टेशन प्रबंधक, मूर्तिजापूर 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाShakuntala Trainशकुंतला रेल्वे