शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

...अंतिम प्रवासही सुखाचा नाही!

By admin | Updated: May 16, 2014 21:45 IST

पिंजरच्या स्मशानभूमीत जाण्यासाठी खडकाळ रस्ता

पिंजर(अकोला): संपूर्ण आयुष्य धकाधकीत व्यतित केल्यानंतर चिरनिद्रा घेतलेल्यांचा अंतिम प्रवास हा स्मशानभूमीकडे सुरू होतो. पिंजर येथे मात्र मृतात्म्यांचा हा अंतिम प्रवासही सुखाचा होत नाही. कारण येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे पिंजर्डा नदीच्या काठावरील ओबडधोबड खडकांवरूनच जावे लागते. पिंजर हे बार्शीटाकळी तालुक्यातील मोठे गाव असून, या गावची लोकसंख्या जवळपास २० हजाराच्या घरात आहे. येथे पिंजर्डा नदीकाठी कारंजा रस्त्याच्या पुलाजवळ हिंदू स्मशानभूमीची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र स्मशानभूमीच्या निर्मितीपासून आजपर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावरून मृतदेह नेताना अंतिम यात्रेत सहभागी झालेल्यांना तारेवरची कसरत करावी लागते. स्मशानभूमी विकास योजनेंतर्गत पिंजर ग्रामपंचायतला १२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला असतानाही स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता मात्र अद्यापर्यंत बांधण्यात आला नाही. ग्रामपंचायत प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बांधण्यात आला नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. दुसरा रस्ता नसल्यामुळे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी अंतिम यात्रेत सहभागी झालेल्या लोकांना पिंजर्डा नदीतील खडकांवरून कसेबसे जावे लागते. पावसाळ्यात तर ही परिस्थिती आणखी भीषण होते. रस्ताच नव्हे, तर स्मशानभूमीचीही प्रचंड दुरवस्था झालेली आहे. स्मशानभूमीचे शेडही व्यवस्थित नसून, ओट्यांची पडझड झाली आहे. स्मशानभूमीत वृक्षारोपणाचीही तसदी ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.