शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

गत आर्थिक वर्षांत ४१ हजार नागरिकांनी केले स्थलांतर!

By admin | Updated: September 2, 2016 01:04 IST

रोजगार, शिक्षण, व्यवसाय आदी कारणांसाठी मोठय़ाप्रमाणात स्थलांतर होते.

नीलेश शहाकारबुलडाणा, दि. १: राज्यात रोजगार, शिक्षण तथा व्यवसायासाठी मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होत असून २0१५-१६ या आर्थिक वर्षात तब्बल ४१ हजार ७१६ नागरिकांनी विविध कारणांसाठी इतर जिल्हे, राज्य व देश पातळीवर स्थलांतर केले असल्याचे राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने सादर केलेल्या अहवालानुसार निदर्शनास आले. स्थलांतराला रोजगार, शिक्षण, व्यवसाय आदी मुख्य कारणे आहेत. जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी बर्‍याच वेळा मनुष्यावर स्थलांतर करण्याची वेळ येते. यावेळी कामाच्या शोधात मनुष्य स्वत: किंवा कुटुंबासह इतर जिल्ह्यात, राज्यात व देशाबाहेर स्थलांतर करतो. बर्‍याच वेळा स्थलांतरित व्यक्ती स्थलांतर झालेल्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्याला राहतो. यात मजूर किंवा शासकीय नोकरदार वर्गाचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. तर यात विवाहित पुरुष-स्त्रियांची संख्या उल्लेखनीय आहे. भारतीय जनगणनेच्या आधारावर राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालन विभागाकडे याबाबत नोंदणी दरवर्षी अद्यावत केली जाते. यानुसार २0१५- १६ या आर्थिक वर्षात ४१ हजार ७१६ नागरिकांची स्थलांतरित म्हणून नोंदणी करण्यात आली. यात ग्रामीण २२ हजार ४५0 तर शहरी १९ हजार २६५ नागरिकांचा समावेश आहे. तर यात पुरुष १६ हजार ७६४ असून स्थलांतरित झालेल्या स्त्रिायांची संख्या २४ हजार ९५२ एवढे आहे, हे विशेष.महिलाचे स्थलांतर जास्तभारतीय रुढीनुसार, विवाहानंतर मुलगी तिच्या पतीच्या घरी जाते किंवा रोजगाराच्या शोधात पतीसोबत पत्नी जाण्याचे कारणही आहे, याआधारे अहवालानुसार स्थलांतरीत महिलांची संख्या जास्त दर्शविण्यात आली आहे. यात विवाह कारणातून ग्रामीण भागात १0 हजार ६९१ तर नागरी भागातून ४ हजार १७७ अशा एकूण १४ हजार ७५४ स्त्रियांनी वर्षभरात स्थलांतर केल्याची नोंदणी आहे. या तुलनेत वर्षभरात विवाहकारणातून स्थलांतर झालेल्या पुरुषांचा आकडा केवळ ११४ एवढा आहे.स्थलांतराच्या कारणांचा आलेखकारण              स्त्री - पुरुषरोजगार            ६९0५व्यवसाय             १९३शिक्षण                ६0४विवाह              १४८६८जन्मानंतर         ५१0९कुटुंबासह            ७१८८इतर                  ६८४८