शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गत आर्थिक वर्षांत ४१ हजार नागरिकांनी केले स्थलांतर!

By admin | Updated: September 2, 2016 01:04 IST

रोजगार, शिक्षण, व्यवसाय आदी कारणांसाठी मोठय़ाप्रमाणात स्थलांतर होते.

नीलेश शहाकारबुलडाणा, दि. १: राज्यात रोजगार, शिक्षण तथा व्यवसायासाठी मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होत असून २0१५-१६ या आर्थिक वर्षात तब्बल ४१ हजार ७१६ नागरिकांनी विविध कारणांसाठी इतर जिल्हे, राज्य व देश पातळीवर स्थलांतर केले असल्याचे राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने सादर केलेल्या अहवालानुसार निदर्शनास आले. स्थलांतराला रोजगार, शिक्षण, व्यवसाय आदी मुख्य कारणे आहेत. जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी बर्‍याच वेळा मनुष्यावर स्थलांतर करण्याची वेळ येते. यावेळी कामाच्या शोधात मनुष्य स्वत: किंवा कुटुंबासह इतर जिल्ह्यात, राज्यात व देशाबाहेर स्थलांतर करतो. बर्‍याच वेळा स्थलांतरित व्यक्ती स्थलांतर झालेल्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्याला राहतो. यात मजूर किंवा शासकीय नोकरदार वर्गाचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. तर यात विवाहित पुरुष-स्त्रियांची संख्या उल्लेखनीय आहे. भारतीय जनगणनेच्या आधारावर राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालन विभागाकडे याबाबत नोंदणी दरवर्षी अद्यावत केली जाते. यानुसार २0१५- १६ या आर्थिक वर्षात ४१ हजार ७१६ नागरिकांची स्थलांतरित म्हणून नोंदणी करण्यात आली. यात ग्रामीण २२ हजार ४५0 तर शहरी १९ हजार २६५ नागरिकांचा समावेश आहे. तर यात पुरुष १६ हजार ७६४ असून स्थलांतरित झालेल्या स्त्रिायांची संख्या २४ हजार ९५२ एवढे आहे, हे विशेष.महिलाचे स्थलांतर जास्तभारतीय रुढीनुसार, विवाहानंतर मुलगी तिच्या पतीच्या घरी जाते किंवा रोजगाराच्या शोधात पतीसोबत पत्नी जाण्याचे कारणही आहे, याआधारे अहवालानुसार स्थलांतरीत महिलांची संख्या जास्त दर्शविण्यात आली आहे. यात विवाह कारणातून ग्रामीण भागात १0 हजार ६९१ तर नागरी भागातून ४ हजार १७७ अशा एकूण १४ हजार ७५४ स्त्रियांनी वर्षभरात स्थलांतर केल्याची नोंदणी आहे. या तुलनेत वर्षभरात विवाहकारणातून स्थलांतर झालेल्या पुरुषांचा आकडा केवळ ११४ एवढा आहे.स्थलांतराच्या कारणांचा आलेखकारण              स्त्री - पुरुषरोजगार            ६९0५व्यवसाय             १९३शिक्षण                ६0४विवाह              १४८६८जन्मानंतर         ५१0९कुटुंबासह            ७१८८इतर                  ६८४८