शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:40 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत २१ सप्टेंबरपर्यंंत जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ४२ शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरले असून, कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंंत असल्याने, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शुक्रवार अखेरचा दिवस आहे. 

ठळक मुद्देजिल्हय़ात १ लाख ३६ हजार शेतकर्‍यांनी भरले ‘ऑनलाइन’ अर्जअर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे होणार चावडी वाचन!२ लाख ४४ हजार शेतकर्‍यांच्या अर्जांंची नोंदणी!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत २१ सप्टेंबरपर्यंंत जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ४२ शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरले असून, कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंंत असल्याने, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शुक्रवार अखेरचा दिवस आहे.  सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंंंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरून घेण्याचे काम गत २४ जुलैपासून जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर सुरू आहे. २१ सप्टेंबरपर्यंंंत जिल्हय़ात १ लाख ३६ हजार ४२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे अर्ज भरण्यात आले. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शासनामार्फत यापूर्वी १५ सप्टेंबरपर्यंंंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर कर्जमाफीचे अर्ज भरण्यास शासनाकडून सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुषंगाने कर्जमाफीचे अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस शुक्रवार, २२ सप्टेंबर आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी जिल्हय़ातील सेतू केंद्रांवर कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे होणार चावडी वाचन!कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर, कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या गावनिहाय याद्या तयार करण्यात येणार आहेत. या शेतकरी याद्यांचे गावनिहाय चावडी वाचन करण्यात येणार आहे, असे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले.

२ लाख ४४ हजार शेतकर्‍यांच्या अर्जांंंची नोंदणी!कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील सेतू केंद्रांवर गत २४ जुलै ते २१ सप्टेंबर या कालावधीत २ लाख ४४ हजार ८३0 शेतकर्‍यांच्या अर्जांंंची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ३६ हजार ४२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले.