शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

भूसुरुंग निकामी करून बांग्लादेशकडे केली कूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:21 IST

अकोला : १९७१ च्या युद्धात भारत-पाकिस्तानच्या युद्धात ऑर्डनन्स विभागाचे योद्धा म्हणून प्रत्यक्ष सहभाग नोंदविलेल्या प्रल्हाद गुजर यांनी महत्त्वाची भूमिका ...

अकोला : १९७१ च्या युद्धात भारत-पाकिस्तानच्या युद्धात ऑर्डनन्स विभागाचे योद्धा म्हणून प्रत्यक्ष सहभाग नोंदविलेल्या प्रल्हाद गुजर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बांग्लादेशात घुसण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय सैन्याच्या वाटेत भूसुरुंग पेरण्यात आले होेेते. यावेळी त्यांनी सीमेवर जाऊन हे भूसुरुंग निकामी केले व भारतीय सैन्याने बांग्लादेशकडे कूच केली. या युद्धात अनुभवलेल्या थरारक क्षणांना त्यांनी ‘लोकमत’ सोबत बोलताना उजाळा दिला. डिसेंबर १९७१ मध्ये झालेले भारत-पाक युद्ध भारत व पाकिस्तानमधील तिसरे युद्ध होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला व बांग्लादेशाची निर्मिती केली. या युद्धात प्रल्हाद गुजर यांनीही सहभाग नोंदविला होता. प्रल्हाद गुजर हे १९६२ ला भारतीय सैन्यात दाखल झाले. त्यांचे प्रशिक्षण होत नाही तोच त्यांना चीनसोबत झालेल्या युद्धात सहभागी व्हावे लागले. त्यांनी १९७१ च्या भारत-पाक युद्धातही प्रत्यक्ष सहभागी होत थरार अनुभवला. ते सांगताना म्हणाले, युद्धाची सुरुवात पाकिस्तानी आक्रमणाने झाली. भारतीय सैन्य बांग्लादेशमध्ये कूच करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी बांग्लादेशच्या सीमेवर पाक सैन्याने भूसुरुंग पेरले. या भूसुरुंगावर केवळ २०० ग्रॅम वजन पडल्यास विस्फोट होत होता. यावेळी प्रल्हाद गुजर यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यावेळी ते जेसोर सेक्टरमध्ये कार्यरत होते. त्यांनी टीमसोबत बांग्लादेश सीमेवर जात सर्व भूसुरुंगांचा शोध लावला. हे भूसुरुंग निकामी करीत भारतीय सैन्याला पुढील वाट मोकळी करून दिली. १९९४ साली ते सुभेदार मेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले.

या युद्धांमध्ये सहभाग

१९६२ साली चीनसोबत झालेल्या युद्धात, १९६५ साली पाकिस्तानसोबत, १९७१ बांग्लादेशासोबत, तसेच ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला होता. या युद्धांमध्ये दाखविलेल्या शौर्यामुळे त्यांनी पश्चिमी स्टार, पूर्वी स्टार हे पदक मिळाले.

देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती प्रत्येकाचे कर्तव्य आहे. युवा वर्गामध्ये देश आहे तर आपण आहोत, अशी भावना पाहिजे.

- प्रल्हाद गुजर, सेवानिवृत्त सैनिक