शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भूसुरुंग निकामी करून बांग्लादेशकडे केली कूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:21 IST

अकोला : १९७१ च्या युद्धात भारत-पाकिस्तानच्या युद्धात ऑर्डनन्स विभागाचे योद्धा म्हणून प्रत्यक्ष सहभाग नोंदविलेल्या प्रल्हाद गुजर यांनी महत्त्वाची भूमिका ...

अकोला : १९७१ च्या युद्धात भारत-पाकिस्तानच्या युद्धात ऑर्डनन्स विभागाचे योद्धा म्हणून प्रत्यक्ष सहभाग नोंदविलेल्या प्रल्हाद गुजर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बांग्लादेशात घुसण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय सैन्याच्या वाटेत भूसुरुंग पेरण्यात आले होेेते. यावेळी त्यांनी सीमेवर जाऊन हे भूसुरुंग निकामी केले व भारतीय सैन्याने बांग्लादेशकडे कूच केली. या युद्धात अनुभवलेल्या थरारक क्षणांना त्यांनी ‘लोकमत’ सोबत बोलताना उजाळा दिला. डिसेंबर १९७१ मध्ये झालेले भारत-पाक युद्ध भारत व पाकिस्तानमधील तिसरे युद्ध होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला व बांग्लादेशाची निर्मिती केली. या युद्धात प्रल्हाद गुजर यांनीही सहभाग नोंदविला होता. प्रल्हाद गुजर हे १९६२ ला भारतीय सैन्यात दाखल झाले. त्यांचे प्रशिक्षण होत नाही तोच त्यांना चीनसोबत झालेल्या युद्धात सहभागी व्हावे लागले. त्यांनी १९७१ च्या भारत-पाक युद्धातही प्रत्यक्ष सहभागी होत थरार अनुभवला. ते सांगताना म्हणाले, युद्धाची सुरुवात पाकिस्तानी आक्रमणाने झाली. भारतीय सैन्य बांग्लादेशमध्ये कूच करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी बांग्लादेशच्या सीमेवर पाक सैन्याने भूसुरुंग पेरले. या भूसुरुंगावर केवळ २०० ग्रॅम वजन पडल्यास विस्फोट होत होता. यावेळी प्रल्हाद गुजर यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यावेळी ते जेसोर सेक्टरमध्ये कार्यरत होते. त्यांनी टीमसोबत बांग्लादेश सीमेवर जात सर्व भूसुरुंगांचा शोध लावला. हे भूसुरुंग निकामी करीत भारतीय सैन्याला पुढील वाट मोकळी करून दिली. १९९४ साली ते सुभेदार मेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले.

या युद्धांमध्ये सहभाग

१९६२ साली चीनसोबत झालेल्या युद्धात, १९६५ साली पाकिस्तानसोबत, १९७१ बांग्लादेशासोबत, तसेच ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला होता. या युद्धांमध्ये दाखविलेल्या शौर्यामुळे त्यांनी पश्चिमी स्टार, पूर्वी स्टार हे पदक मिळाले.

देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती प्रत्येकाचे कर्तव्य आहे. युवा वर्गामध्ये देश आहे तर आपण आहोत, अशी भावना पाहिजे.

- प्रल्हाद गुजर, सेवानिवृत्त सैनिक