शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

लंघापूर येथील ३०५ प्रकल्पग्रस्तांसाठी सिरसो गावठाणात भूखंड निश्चित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:13 IST

अकोला : उमा बॅरेज प्रकल्पांतर्गत लंघापूर येथील पूर्णत: बाधित ३०५ प्रकल्पग्रस्तांसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील पुनर्वसित गावठाणात ...

अकोला : उमा बॅरेज प्रकल्पांतर्गत लंघापूर येथील पूर्णत: बाधित ३०५ प्रकल्पग्रस्तांसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील पुनर्वसित गावठाणात भूखंड निश्चित करण्यासाठी गुरुवार व शुक्रवारी सोडत काढण्यात आली असून, त्यामध्ये इश्वर चिठ्ठी पद्धतीने भूखंड निश्चित करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे उपस्थित होते.

सिरसो येथील पुनर्वसित गावठाणामध्ये नगररचना विभागाच्या नियमानुसार मंजूर अभिन्यास नकाशाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना भूखंडांचे वाटप करण्यासाठी सोडत काढण्यात आली. सोडतमध्ये संभाजी मंगेश पाचडे या बालकाच्या हस्ते इश्वर चिठ्ठी काढून ३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड निश्चित करण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भूखंड निश्चित करण्यासाठी सोडत काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी उमा बॅरेज प्रकल्पाचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, प्रकल्प यंत्रणेचे कार्यकारी अभियंता अमित राऊत, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, उपविभागीय अभियंता अविनाश साल्पेकर आदी उपस्थित होते.

असे निश्चित करण्यात आले भूखंड !

३०५ प्रकल्पग्रस्तांसाठी भूखंड निश्चित करण्यात आले. त्यामध्ये १८५ चौरसमीटरचे १४३ भूखंड, २७७.५ चौरसमीटरचे २६ भूखंड, ३७० चौरसमीटरचे ११४ भूखंड, ५५५ चौरस मीटरचे २० आणि ७४० चौरस मीटरचे २ असे एकूण ३०५ भूखंड निश्चित करण्यात आले, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सदाशिव शेलार यांनी दिली.