शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

शिवभाेजन केंद्रांची लाेकप्रतिनिधींनी घेतली झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:18 IST

काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’चे आवाहन केल्यानंतर आता ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले ...

काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’चे आवाहन केल्यानंतर आता ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. यादरम्यान, गरजू व गरीब नागरिकांना दाेन वेळच्या जेवणाची साेय उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनाचा समावेश आहे. यामध्ये गरजूंना मोफत धान्य व शिवभाेजन केंद्रांच्या माध्यमातून माेफत थाळी देण्याचा समावेश आहे़ स्थलांतरित मजूर, बाहेरगावचे विद्यार्थी व बेघरांना मोफत शिवभोजन थाळी देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. जिल्ह्यात प्रत्यक्षात २६ लाख लाेकसंख्या असून, जिल्ह्यात १५ केंद्रांच्या माध्यमातून फक्त ३ हजार थाळींचे वितरण करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. शुक्रवारी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर यांनी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य जिल्हा स्त्री रुग्णालय, कृषी उत्पन्न बाजार समिती येथील केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली असता अल्प वेळेतच थाळीचे वाटप करण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे अनेक गरजूंना परत जावे लागल्याचा प्रकार समाेर आला.

फोटो :

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

गरजूंना माेफत अन्नधान्य व थाळीचे वाटप केले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत आ. रणधीर सावरकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसाेबत संवाद साधण्यात आला असता माेफत अन्नधान्य वाटपासंदर्भात अद्यापपर्यंत शासनाचे निर्देश प्राप्त झाले नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांनी सांगितले. यावेळी आ. गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, जयंत मसने आदी उपस्थित हाेते़