शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शिवभाेजन केंद्रांची लाेकप्रतिनिधींनी घेतली झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:18 IST

काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’चे आवाहन केल्यानंतर आता ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले ...

काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’चे आवाहन केल्यानंतर आता ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. यादरम्यान, गरजू व गरीब नागरिकांना दाेन वेळच्या जेवणाची साेय उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनाचा समावेश आहे. यामध्ये गरजूंना मोफत धान्य व शिवभाेजन केंद्रांच्या माध्यमातून माेफत थाळी देण्याचा समावेश आहे़ स्थलांतरित मजूर, बाहेरगावचे विद्यार्थी व बेघरांना मोफत शिवभोजन थाळी देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. जिल्ह्यात प्रत्यक्षात २६ लाख लाेकसंख्या असून, जिल्ह्यात १५ केंद्रांच्या माध्यमातून फक्त ३ हजार थाळींचे वितरण करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. शुक्रवारी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर यांनी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य जिल्हा स्त्री रुग्णालय, कृषी उत्पन्न बाजार समिती येथील केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली असता अल्प वेळेतच थाळीचे वाटप करण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे अनेक गरजूंना परत जावे लागल्याचा प्रकार समाेर आला.

फोटो :

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

गरजूंना माेफत अन्नधान्य व थाळीचे वाटप केले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत आ. रणधीर सावरकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसाेबत संवाद साधण्यात आला असता माेफत अन्नधान्य वाटपासंदर्भात अद्यापपर्यंत शासनाचे निर्देश प्राप्त झाले नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांनी सांगितले. यावेळी आ. गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, जयंत मसने आदी उपस्थित हाेते़